मूल्यांशिवाय आदर्श समाजाची कल्पना अशक्य : सुरेश सोनी

    03-Feb-2025
Total Views |

Suresh Soni RSS

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Suresh Soni VSK Indore)
विश्व संवाद केंद्र, इंदौर आयोजित नर्मदा साहित्य मंथन या साहित्योत्सवाच्या 'अहिल्या पर्वा'चे उद्घाटन नुकतेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठाच्या सभागृहात झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश सोनी यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाची सुरुवात झाली. 'मूल्यांशिवाय आदर्श समाजाची कल्पना करता येत नाही. समाजात मूल्यव्यवस्था रुजवण्यासाठी एखादा विमर्श निर्माण करून त्याचा प्रसार करण्याची गरज आहे. आपली पारंपारिक संस्कृती नेहमीच मूल्याधारित राहिली आहे, परंतु वेळोवेळी नवीन चर्चा घडवण्याची गरज आहे.', असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडल्याचे पाहायला मिळाले.

हे वाचलंत का? : वसंत पंचमीला ६२ लाखांहून अधिक भाविकांचे अमृत स्नान

‘भारतीय विचारांचे खंडन करण्याची परंपरा’ या विषयावर आपले मत व्यक्त करत सुरेश सोनी पुढे म्हणाले, राष्ट्र उभारणीसाठी आचार, विचार आणि भावनांची आवश्यकता असते. विचारांना भावनेतून बळकटी आणली पाहिजे आणि आचार हे विचारातून बळकट केले पाहिजेत. वादविवाद करताना सर्व विचारांची चर्चा झाली पाहिजे, त्यातून राष्ट्रीय विचारांना बळ मिळाले पाहिजे. भारत ही महापुरुषांची भूमी आहे आणि तिला आचार आणि विचारांची मोठी सनातन परंपरा आहे. आजही भारतात सनातनी परंपरा विकसित आणि प्रस्थापित आहे. वेळोवेळी कल्पनांवर आक्रमणे होतात. अशा परिस्थितीत आपण आपले विचार शुद्ध केले पाहिजेत. विचार शुद्ध करण्यासाठी विचारांचे खंडन आवश्यक आहे. विचारात विस्तार, समज, अभ्यास, प्रयोग आणि प्रसार व्हायला हवा. समाजात मूल्ये रुजली पाहिजेत, मूल्यांशिवाय आदर्श समाजाची कल्पना करता येत नाही आणि त्यासाठी चर्चा घडवावी लागेल."