लखनऊ : योगी सरकारने उत्तर प्रदेशातील संभलची धार्मिक ओळख व्हावी असा विश्वास निर्माण केला आहे. जिल्हा प्रशासन शास्त्रात वर्णन करण्यात आलेल्या सर्व तीर्थस्थळांच्या आणि विहिरींचे शोधकाम सुरू आहे. संभलचे दंडाधिकारी डॉ. राजेंद्र पेन्सिया म्हणाले की, संभल हे एक तीर्थक्षेत्र असून शहरातील तीन प्रमुख शिवमंदिराचा या तीर्थक्षेत्राचा उल्लेख करण्यात आला. यात ८७ देवतीर्थ आणि ५ महातीर्थांचा समावेश आहे.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले की, संभलमध्ये आतापर्यंत ६० देव तीर्थस्थळे ओळखली गेली. तसेच उर्वरित तीर्थस्थळांचा शोध घेण्यात येत आहे. वंदना योजना, तसेच नगर परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगातून आणि पर्यटन आणि धार्मिक विभागाच्या अर्थसंकल्पातून काम पूर्ण केले जाणार असल्याचा विश्वास दिला.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले की, "यासाठी सविस्तर प्रकल्पाचे अहवालही तयार करण्यात आले आहेत. संबंधित अहवाल आता सरकारकडे पाठवला जाईल. जिल्ह्यातील जुन्या विहिरींचे बांधकाम करण्यासाठी लागणारा अर्थलाभ यासाठी आवश्यक योजना आखली जाईल. जेणेकरून प्रकल्पाचे संवर्धन करता येणार असल्याचे सांगितले गेले आहे," या तीर्थस्थळांना जलतीर्थ असेही म्हटले जात आहे.
दरम्यान, दंडाधिकारी राजेंद्र पानसिया पुढे म्हणाल्या की, जेव्हा ४८ किमी लांबीच्या कोसी परिक्रमा पूर्ण होईल आणि तीर्थस्थळांचे सुशोभीकरण केले जाईल, तेव्हा संभळमध्ये एक प्रमुख तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येईल. राज्य सरकार हे संभलला प्रमुख तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी सतत काम करत आहे.