Jaigad Port : जयगड बंदरातून काजू निर्यात होणार

31 Dec 2025 18:19:19
Jaigad Port
 
मुंबई : (Jaigad Port) रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून (Jaigad Port) काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याविषयी नुकतीच मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.(Jaigad Port)
 
बैठकीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, 'मित्रा'चे सल्लागार परशराम पाटील यांच्यासह जे एस डब्ल्यू ग्रूपचे प्रतिनिधी उपस्थित होते.(Jaigad Port)
 
हेही वाचा : ST Corporation : श्रद्धेच्या यात्रेसाठी लालपरी सज्ज!  
 
निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी लागणारी सर्व ती मदत विभाग करेल असे सांगून मंत्री नितेश राणे म्हणाले की, कोकणातील उत्पादने लवकरात लवकर आणि सहज निर्यात होण्यासाठी ही प्रक्रिया लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. बंदराला जोडणी होण्यासाठी कोल्हापूर - वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गतीने हाती घेण्यात येत आहे. उत्पादन तपासणी प्रयोगशाळा १५ जानेवारीपर्यंत सुरू करावी. यंदाच्या हंगामात काजू जयगड बंदरातून (Jaigad Port) निर्यात होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी तयारी करावी. उत्पादकांमध्ये जागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन करावे असेही मंत्री राणे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.(Jaigad Port)
 
 
Powered By Sangraha 9.0