मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी ‘मुंबईचा महापौर खान होणार’ या उपस्थित केलेल्या चर्चेला कदापि हलक्यात न घेता, त्याचा गांभीर्याने विचार करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. याचा प्रत्ययही नुकताच छत्रपती संभाजीनगरमध्ये आला, जिथे उद्धव ठाकरेंनी रशीद मामू खान या वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला आपल्या पक्षात प्रवेश दिला. एवढेच नाही तर महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात घडलेल्या विविध घडामोडींकडे मुंबईकरांनी काळजीपूर्वक पाहिल्यास, ‘मुंबईचा महापौर खान होणार’ या आ. साटम यांच्या विधानामागचे गांभीर्य आपसुकच लक्षात येईल.
महाराष्ट्रात नगर परिषदा, नगर पंचायत निवडणूक पार पडल्या असून, भाजपची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली. भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. महाराष्ट्रातील जनताजनार्दन भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे स्पष्ट झाले असल्याने, विरोधी महाआघाडीची दाणादाण झाली आहे. महायुती तथा भाजपच्या विजयामुळे मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर ठाकरे बंधूसुद्धा एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणे चांगली घटना म्हणावी लागेल. पण, आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या एकत्र येण्याचा फारसा फायदा होणार नाही, असे चित्र मुंबई शहरात पाहावयास मिळत आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकीत काय चमत्कार होईल, हे मात्र कोणीही सांगू शकत नसले, तरी मुंबईमध्ये भाजपची घोडदौड कोणी थांबवू शकणार नाही, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
मुंबईत महायुतीने विशेषतः भाजपने मराठी-अमराठी मुद्द्याला बगल देऊन ‘हिंदू एकता-हिंदू सारा एक’ हे ध्येय समोर ठेवून आपले सर्व लक्ष केंद्रित केले आहे. सोबतच मुंबईच्या व हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेऊन मुंबईमधील सर्व वॉर्डमध्ये विजयाची रणनीती आखली केली आहे. सामाजिक एकतेचा संदेश देणार्या मकरसंक्रांत सण-उत्सवानंतर दुसर्या दिवशी दि. १५ जानेवारी रोजी सर्व महानगरपालिकांसाठीचे मतदान होणार आहे आणि मुंबईचा मतदार तिळगुळ देऊन घेऊन कोणासोबत गोड बोलणार आणि कोणाला मतदान करणार, याचा निर्णय करणार आहेत.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपची प्रचंड विजयी घोडदौड दिसली आहे. महाराष्ट्रात भाजप क्रमांक एक पक्ष ठरला असून, आता तीच विजयाची घोडदौड मुंबईत शहरात दिसेल, याची शक्यता नाकारता येत नाही. देशाची आर्थिक राजधानी आणि सर्वांना सांभाळून घेत असलेल्या मुंबई शहराकडे महायुती विशेष लक्ष देत असून, मुंबई विकासासोबत मुंबईची सुरक्षासुद्धा महत्त्वाची असल्याचे भाजपचे ठाम मत आहे. काही महिन्यांपूर्वी म्हणजे महानगरपालिका निवडणूक लागण्याअगोदर भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी मुंबईमध्ये महाआघाडी शिवसेना उबाठा बहुमताने निवडून आल्यास मुंबईचे पालकमंत्री राहिलेल्या अस्लम शेखप्रमाणे मुंबईचा महापौरही खान होऊ शकतो, असे गांभीर्यपूर्ण सूचक वक्तव्य केलेलं होतं; सोबतच युरोपमधील इंग्लंडचे महापौर सादिक खान आणि अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील महापौर जोहरान ममदानी यांची आठवण करून देऊन तेथे काय परिस्थिती निर्माण झाली, याचे विवेचनसुद्धा केले आहे. परंतु, मुंबईकरांनी तेव्हा अमीत साटम यांच्या सूचक वक्तव्याची दखल घेतली नव्हती; पण आता छत्रपती संभाजीनगरमधील रशीद मामू खान यांचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश झाला, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
संभाजीनगरमधील रशीद खान कोण आहे आणि त्याचे कारनामे काय आहेत, तसेच दंगलीच्या गंभीर गुन्ह्याच्या नोंदी सर्वश्रुत असल्याने उबाठा शिवसेना पक्षाअंतर्गतच रशीद मामू खान यांना विरोधसुद्धा होऊ लागला आहे. तसेच मागील महिन्यात तामिळनाडूमधील तिरुपंरकुंद्रम मंदिरातील दीपउत्सव परंपरा विरोधात उद्धव ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांनी घेतलेल्या हिंदुत्वविरोधी भूमिकामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्व विचारसरणीच्या सैनिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. महाआघाडी सरकार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई बॉम्बस्फोट आरोपी याकूब मेमन यांच्या सुटकेसाठी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर महाआघाडी घटक असलेल्या अस्लम शेख यांनी स्वाक्षरी केली होती आणि नंतर त्यांनाच मुंबईचे पालकमंत्री करण्यात आले होते; तसेच याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण आणि मुंबईमधील असंख्य विकासकामाचे टिपू सुलतान नामकरण, ‘मराठी भवनां’ऐवजी ‘उर्दू भवने’ उभी राहिली आहेत, अशी सर्व कामे महाआघाडी सरकार म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात झालेली आहेत आणि हे सर्व प्रकार मुंबईतील राजकीय पक्ष विसरले असतील, पण मुंबईमधील सामान्य माणूस विसरला नाही. तो सामान्य माणूस यांना धडा शिकविण्याची वाट बघत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उबाठा-मनसे महाआघाडीला विजय मिळाल्यास उद्धव ठाकरे मुंबईचा महापौर मराठीऐवजी खान करतील काय, अशी शंका मुंबईतील सामान्य माणूस व्यक्त करीत असून, मुंबईमध्ये परिवर्तन अटळ असल्याचेसुद्धा बोलत आहे.
मुंबई शहराला अवैध बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांनी विळखा घातलेला आहे. एवढेच नाही तर त्यांच्या विघातक कृत्यामुळे अनेक वेळा मुंबईची सुरक्षा धोयात आलेली आहे. १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटनंतर आझाद मैदानावरील ‘रझा अॅकेडमी’चा हिंसक मोर्चा, ‘मालवणी पॅटर्न’, ‘लव्ह जिहाद’, ‘व्होट जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’च्या बेधुंद राक्षसाने मुंबईमध्ये अनेक वेळा मुंबईमध्ये नंगानाच केला आहे व आताही पुन्हा विघातक कृत्यांनी आपले डोके वर काढले आहे, त्यामुळे अमीत साटम यांनी ‘मुंबईचा महापौर खान होईल का?’ या व्यक्त केलेल्या चर्चेला हलक्यात न घेता, गांभीर्याने विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपसाठी आव्हान जरी असले, तरी ते आव्हान पेलण्यास भाजप समर्थ असल्याचे मुंबईमधील जाणकारांचे मत आहे. शक्तिपुत्र नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या व्हिजनमुळे भाजपचा विजयी अश्व केरळपासून बिहारमध्ये आणि देशाच्या विविध भागामधील निवडणुकांमध्ये सतत विजयी ठरत आहे. मुंबईच्या सुरक्षा आणि विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा दृष्टिकोन आणि निर्भीड मुंबई शहर अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका मिशन यशस्वी होईल, अशी मुंबईकरांमध्ये चर्चा आहे.
- अशोक राणे