E-crop Inspection : ई-पीक पाहणीतून सुटलेल्यांना १५ जानेवारीपर्यंत 'ऑफलाईन' नोंदणीची संधी

    13-Dec-2025   
Total Views |
E-crop Inspection
 
नागपूर : (E-crop Inspection) 'ई-पीक पाहणी'ची (E-crop Inspection) ऑनलाईन मुदत संपल्याने हजारो शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर आपला माल विकण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाल्याने या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने आता 'ऑफलाईन' पीक (E-crop Inspection) पाहणीची संधी उपलब्ध करून दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली. यानुसार, ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी (E-crop Inspection)राहून गेली आहे, त्यांना आता १५ जानेवारीपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडे ऑफलाईन अर्ज करता येणार आहेत.(E-crop Inspection)
 
आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. ई-पीक पाहणीसाठी (E-crop Inspection) तीन वेळा मुदतवाढ देऊनही अनेक शेतकरी तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे नोंदणी करू शकले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ई-पीक पाहणीची (E-crop Inspection) नोंद सातबाऱ्यावर असल्याशिवाय 'नाफेड' किंवा शासकीय केंद्रांवर शेतमाल खरेदी केला जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.(E-crop Inspection)
 
हेही  वाचा : Kerala : केरळमध्ये डाव्यांचा गड कोसळला; तिरुअनंतपुरम महानगरपालिकेत पहिल्यांदाच एनडीए विजयी  
 
यावर उत्तर देताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, "ई-पीक पाहणीचे (E-crop Inspection) पोर्टल आता बंद झाले असल्याने ते पुन्हा सुरु करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही 'ऑफलाईन' खिडकी उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत केवळ खऱ्या शेतकऱ्यांसाठी असून, व्यापाऱ्यांनी याचा गैरफायदा घेऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.(E-crop Inspection) 
 
कशी असेल प्रक्रिया?
 
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार असून त्यात तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश असेल. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी राहिली आहे, त्यांनी १५ जानेवारीपर्यंत या समितीकडे अर्ज करायचे आहेत. खरीप हंगाम संपला असला तरी, ही समिती तक्रारींचे निवारण करेल, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा करेल आणि आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल. जिल्हाधिकारी हा अहवाल पणन विभागामार्फत केंद्र सरकारला पाठवतील, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करणे शक्य होईल.(E-crop Inspection) 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....