अमरावती : ( Kirit Somaiya ) अमरावती जिल्ह्यातील ५०४ बेपत्ता बांग्लादेशी, रोहिंग्या आणि अवैध नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली.
अमरावती महानगरपालिकेने १ हजार ७०९ बेकायदेशीरपणे जन्म प्रमाणपत्रे दिली असल्याचे उघड झाले होते. ही सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द करून ती परत मिळवण्यासाठी कारवाई सुरु असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली होती. दरम्यान, आता बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती महानगरपालिकेने बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवल्याबद्दल ५०४ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३६, ३४० आणि ३१८ अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
बेकायदेशीरपणे जन्म प्रमाणपत्रे मिळवल्यानंतर, फरार झालेल्या ५०४ (४८५ मुस्लिम आणि १९ हिंदू) लाभार्थ्यांविरुद्ध अमरावती येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१० दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपासानंतर या ५०४ लोकांना फरार घोषित केले जाणार असल्याची माहितीही किरीट सोमय्या यांनी दिली.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....