देशभरातील मंदिरे सरकारी अधिग्रहणापासून मुक्त करा; विराट हिंदू जनसभेत विहिंपची मागणी

दोन लाखांहून अधिक हिंदू जनसमुदायाची उपस्थिती

    06-Jan-2025
Total Views |

VHP Vijaywada Sabha

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Vijaywada Sabha) 
आंध्र प्रदेशच्या विजयवाडाजवळील केसरपल्ली येथे रविवारी एक विराट हिंदू जनसभा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. साधारण दोन लाखांहून अधिक हिंदू जनसमुदाय याठिकाणी उपस्थित होता. दरम्यान १५० संत, विहिंपचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत देशभरातील मंदिरे सरकारी अधिग्रहणापासून मुक्त करण्याची मागणी या सभेदरम्यान करण्यात आली. मंदिरे ही एकेकाळी सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याची केंद्रे होती, जी समाज कल्याणासाठी चालवली जात होती. पण आज परिस्थिती अशी आहे की मंदिरांचे व्यवस्थापन सरकारच्या ताब्यात आहे. असे मत विश्व हिंदू परिषदेकडून व्यक्त करण्यात आले आहे.

हे वाचलंत का ? : दृष्टीदोष दूर करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक : डॉ. कृष्णगोपालजी


विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, वक्फ बोर्डाने ज्या प्रकारे लाखो एकर जमीन ताब्यात घेतली आहे, ती कोणत्याही किंमतीवर स्वीकारता येणार नाही. इस्लाम, ज्याचा उगम चौदाशे वर्षांपूर्वीचा आहे, तो भारत मातेशी संबंधित स्तंभांवरही दावा करत आहे. पूर्वी जिहादी मानसिकतेच्या या लोकांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश सारखे देश निर्माण केले आणि आता ते भारताचे तुकडे करू लागले आहेत, जे योग्य नाही. हे आम्ही अजिबात होऊ देणार नाही. जिहादी लोक अनेक ठिकाणी मिनी पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पाहता वक्फ बोर्डाबाबत आता लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर आता हे लोक प्रयागराजच्या कुंभावरही आपला दावा करत आहेत.


VHP Vijaywada Sabha

विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अॅड. आलोक कुमार यांनी मंदिर प्रशासनात सरकारी हस्तक्षेपाचा निषेध केला. मंदिराचे व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवण्यात यावे, जे त्यांचे खरे पालक आहेत. ‘दान विभाग रद्द करण्यात यावा’, असे ते म्हणाले. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी भारताच्या सुरक्षेला जागतिक कल्याणाशी जोडून हिंदू धर्माचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी धर्मग्रंथ, संत, गायी, तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे हिंदू संस्कृतीचे आधारस्तंभ म्हणून वर्णन केले. “श्रद्धेला प्रेरणा देणारे देवतांचे निवासस्थान असलेली मंदिरे सरकारी नियंत्रणापासून मुक्त राहिली पाहिजेत,” असे त्यांनी नमूद केले.