वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक!

    03-Jan-2025
Total Views | 43
Vande Bharat

मुंबई : वंदे भारत एक्सप्रेसवर ( Vande Bharat Express ) मुंबई ते सोलापूरदरम्यान दगडफेक झाली. गाडीतील सी-११ या डब्याची काच फुटली. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही, परंतु सर्व प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. गाडी मुंबईहून सोलापूरकडे जाताना जेऊर स्थानकाजवळ ही घटना घडली.

गुरुवारी रात्री मुंबईहून सोलापूरसाठी निघालेली वंदे भारत या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली. सोलापूरकडे जाताना जेऊर रेल्वेस्थानकाजवळ ही घटना घडली आहे. या दगडफेकीमध्ये गाडीच्या सी-११ या डब्याची काच फुटली. या घटनेमध्ये सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. दगडफेकीनंतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गाडीवर दगडफेक कोणी केली व त्याचे मुख्य कारण काय यासंदर्भात अधिक तपास स्थानिक पोलिस व रेल्वे अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121