छत्रपतींचा जिरेटोप मस्तकी धारण करण्यासाठी नव्हे, मस्तकावर लावण्यासाठी!

    03-Jan-2025
Total Views | 42
 
Fadanvis
 
पुणे : छत्रपतींचा जिरेटोप मस्तकी धारण करण्यासाठी नसून मस्तकावर लावण्यासाठी आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. शुक्रवार, ३ जानेवारी रोजी आळंदी येथे संत कृतज्ञता संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री क्षेत्र आळंदी येथे राज्यातील सर्व संत, महंत, आचार्य, धर्मगुरू उपस्थित होते. दरम्यान, स्वामी गोविंद देव गिरि महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना त्यांना जिरेटोप प्रदान केला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी तो जिरेटोप मस्तकी धारण करण्सास नकार दिला आणि विनम्रपणे त्यावर आपले डोके टेकवले. यावेळी गोविंद देव गिरि महाराज त्यांना जिरेटोप धारण करण्याची पुन्हा विनंती केली. परंतू, मुख्यमंत्र्यांनी तो आपल्या हातात घेत त्याला नमस्कार केला.
 
हे वाचलंत का? -  सावित्रीआईंच्या नेतृत्वात महिला राज्याकडे आपली वाटचाल सुरु!
 
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सरकार स्थापन होत असताना महाराष्ट्रात आपण सर्वांनी केलेले जागरण अभूतपूर्व आहे. आज समाजात झालेले परिवर्तन हे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांतून झालेले आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी आलेलो आहे. लोकसभा निवडणूकीनंतर आपल्या सर्वांसमोर एक प्रश्न निर्माण झाला होता. या देशात अराजक तयार करण्याचे षडयंत्र झाले. या देशाकडे बल आणि विचार दोन्ही आहे. या दोन्हीच्या आधारावर हा देश बलशाली होईल. त्यामुळे या प्रगतीने चिंतातूर असलेल्या लोकांनी देशात अराजकाची मांडणी सुरु केली. देशाला विविध भींतींमध्ये कसे खंडित करता येईल, आमचे पौरुष कसे समाप्त करता येईल आणि वोट जिहादसारखे विषय मांडून आमच्या विचारांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा इथला सनातन विचार, धर्म, संस्कृती, संस्कृती कमजोर झाले त्यावेळी आम्ही गुलामगिरीत गेलो. ज्यावेळी आमच्या संतांनी धर्म जागरण, समाज जागरण केले आणि या भींती तोडून एकसंघ समाज उभा केला त्यावेळी आम्हाला दिग्विजयी भारत पाहायला मिळाला."
 
"भारतीय सभ्यता ही जगातील सर्वात जुनी सभ्यता आहे. आमच्या सनातन धर्माचे, हिंदू सभ्यतेचे आणि भारतीय सभ्यतेचे वय कोणीच सांगू शकत नाही. अनादी कालापासून चालत आलेला हा विचार आहे. ज्यावेळी राजसत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, त्यांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली नाही आणि त्यांनी स्वार्थासाठी तडजोडी केल्या त्यावेळी या देशात धर्मसत्ता उभी राहिली. या धर्मसत्तेने निरपेक्ष भावनेने लोकांमध्ये जागरण केले आणि त्यातून पुन्हा नवीन राजसत्ता उभी राहिली. आपल्या देशाच्या इतिहासात धर्मसत्तेने राज्य केले असे कुठेही दिसत नाही. पण जेव्हा राजसत्ता पथभ्रष्ट झाली त्यावेळी त्या राजसत्तेला हटवून धर्माचे आचरण करणारी राजसत्ता बसवण्याचे काम आमच्या धर्माचार्यांनी नेहमीच केले. त्यामुळे या देशाला कधीही कोणी संपवू शकले नाही," असे ते म्हणाले.
 
"लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वोट जिहादसारखे विषय समोर येऊ लागले. अक्षरश: वोट जिहादच्या भरवश्यावर आम्ही लोकसभा जिंकलो आणि आता विधानसभासुद्धा जिंकू असे सांगण्यात आले. त्यामुळे आपण आता जागे झालो नाही तर पुढचा प्रहार हा केवळ राजसत्तेवर नसून धर्मसत्तेवर, संस्कृतीवर, विचारांवर आणि आचरणावर आहे, ही आवश्यकता सर्वांनाच वाटू लागली. स्वतंत्र हिंदुस्तानातील सर्वात मोठे जागरण या निवडणूकीपूर्वी आमच्या संतांनी करून दाखवले. पुन्हा एकदा सगळ्या भींती तोडत आपण एक आहोत, असा भाव निर्माण केला. हे कोणत्या पक्षाला निवडून आणण्याकरिता आपण केले नाही तर विचारांकरिता केले आहे, याची मला जाणीव आहे," असेही ते म्हणाले.
 
गोमातेची सेवा केवळ धर्मकार्य नाही तर राष्ट्रकार्य!
 
"गोमातेची सेवा ही केवळ धर्मकार्य नाही तर राष्ट्रकार्य आहे. आमच्या पुर्वजांनी आम्हाला गोमातेची सेवा करायला सांगून त्यात आमची आई दाखवली. ज्याप्रकारे शेतीमध्ये पर्यावरण बदलामुळे अडचणी तयार झाल्या आणि शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे याचे कारण म्हणजे आम्ही गोमातेला विसरलो आहोत. गोधन कमी झाल्याने गोमातेचे आमच्या जमिनीला देणे बंद झाले आहे. आम्ही आमच्या जमिनीला विष देऊ लागलो. त्यामुळे गोमातेची सेवा ही आपल्या भूमिची सेवा आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121