जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी पुष्पगुच्छ आणू नये! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना

    03-Jan-2025
Total Views | 189
 
Fadanvis
 
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील दौऱ्यावेळी कोणतेही अधिकारी पुष्पगुच्छ आणणार नाहीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. गुरुवार, २ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले.
 
हे वाचलंत का? -  छत्रपतींचा जिरेटोप मस्तकी धारण करण्यासाठी नव्हे, मस्तकावर लावण्यासाठी!
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दौऱ्याबाबत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना काही महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. यापुढे मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कोणत्याही अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणू नये. तसेच पोलिस दलाकडून देण्यात येणाऱ्या मानवंदनेची प्रथाही त्यांच्या दौऱ्यात बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, पोलिस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या आदेशाची प्रत पाठवण्यात आली आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

म्हाडा व अदानी समूह यांच्यात प्रकल्प अंमलबजावणीसाठी करार १६०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक सदनिकेत रहिवाशांचे होणार पुनर्वसन गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली असून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अदाणी समूह यांच्यात मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सोमवार,दि.७ रोजी करार करण्यात आला.म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला 'म्हाडा'चे उपाध्यक्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121