सहकारी संस्थाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा

डॉ. पंकज भोयर करणार उपस्थितांना मार्गदर्शन

    24-Jan-2025
Total Views | 177

Sahakar Bharati Samvad Melawa

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sahakar Bharati Samvad Melawa) 
'आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५' आणि 'सहकार भारती स्थापना दिवस' याचे औचित्य साधून सहकारी संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा राज्याचे गृह (ग्रामीण) व सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचेसोबत संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सहकार भारती, मुंबई विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा मेळावा मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता योगी सभागृह, तळमजला, स्वामीनारायण मंदिरसमोर, दादर (पूर्व) रेल्वेस्टेशन समोर संपन्न होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान डॉ. पंकज भोयर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ताराम चाळके सहभागी होणार आहेत. तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर मंडळींचीही कार्यक्रमाला उपस्थिती असेल. मुंबई महानगरातील, कोकण विभागातील तसेच सहकार क्षेत्रातील संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121