या कंपनीनेही टोरेस सारखीच कार्यप्रणाली वापरत गुंतवणुकदारांच्या डोळ्यात धुळ फेकली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील जळगाव रोडवर या कंपनीचे अलिशान कार्यालय होते. गुंतवणुकदारांना प्रभावित करण्यासाठी या कंपनीचे चालक हर्षल गांधी, प्रतीक शहा यांनी मोठे सेमिनार घेतले. या कंपनीत एका वर्षासाठी १लाख रुपये १० महिन्यांसाठी गुंतवल्यास महीन्याला ३ टक्के परतावा आणि परदेशी सहल असे अमिष कंपनीकडुन दाखवण्यात आले होते.
कंपनीकडुन सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे परतावा मिळत होता, पण अचानक पैसे येणे बंद झाल्यामुळे गुंतवणुकदारांचे धाबे दणाणले. कंपनीच्या कार्यालयाकडे धाव घेतली असता कंपनीचे कार्यालय बंद झाल्याची माहीती मिळाली आणि संचालकांचा फोन लागायला लागला. त्यामुळे घाबरलेल्या गुंतवणुकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. आतापर्यंत या घोटाळ्याची व्याप्ती उघड होत आहे. सरकारी अधिकारी, निवृत्त शिक्षक हेही फसवले गेले आहेत. निवृत्त शिक्षक नाथाराव काकडे यांना १० लाखाचा तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधून निवृत्त झालेले सरताजसिंह चहल यांना तब्बल २१ लाख ५०हजार रुपयांचा गंडा घातला आहे.