गाडीत भजन सुरू असताना कट्टरपंथींकडून वाहनावर हल्ला, हल्लेखोर ममता बॅनर्जींची व्होट बँक असल्याचा भाजप नेत्याचा दावा

    02-Jan-2025
Total Views | 151

Bhajan
 
कोलकाता : भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी आपल्या X ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. प. बंगाल राज्यातील मोदिनीपूर जिल्ह्यातील कांठी शहरामध्ये कट्टरपंथी जमावाने भजन करणाऱ्या वाहनावर हल्ला केला आहे. वक्फ दुरूस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या बैठकीदरम्यान ही घटना घडली आहे. सुवेंदू अधिकारी म्हणाले की, कांठी सेंट्रल बसस्थानक परिसरातून एक वाहन जात असताना त्या गाडीत भजन सुरू होते.
 
हा हल्ला ममता बॅनर्जींच्या मतदारांकडून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेत्याने सांगितले की, भजन लावण्यात येणाऱ्या चारचाकी वाहनातील दोघेजण जखमी झाले आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओत नमाजी टोप्या दिसत आहेत. ते पुरूष वाहनावर हल्ला करत असताना दिसत आहेत.
 
 
गाडीतील प्रवाशांवर जमावाने हल्ला केल्यानंतर भयावह परिस्थिती निर्माण झाली. वाहनात प्रवास करत असलेल्या प्रवाशांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. असे ट्विट त्यांनी लिहिले.
 
यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा गुन्हेगारांची ओळख पटवून देण्यास परिपूर्ण असल्याचे म्हटले गेले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे झालेल्या मृत्यूंसाठी विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार नाही : सर्वोच्च न्यायालय

बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे झालेल्या मृत्यूंसाठी विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार नाही : सर्वोच्च न्यायालय

बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबिय मोटार वाहन कायदा, १९८८ (एमव्ही कायदा) अंतर्गत भरपाईसाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने, बुधवार दि.२ जुलै रोजी दिला आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाने याआधी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी कलम १६६ अंतर्गत केलेली भरपाईची मागणी फेटाळून लावली होती...

ना झेंडा, ना अजेंडा... नेता कोण? - राज-उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा ठरली; पण शेवटी भाषण कोण करणार, यावर घोडे अडले

ना झेंडा, ना अजेंडा... नेता कोण? - राज-उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा ठरली; पण शेवटी भाषण कोण करणार, यावर घोडे अडले

त्रिभाषा सूत्रावरून उगाचचा गोंधळ घालणाऱ्या ठाकरे बंधूंना अखेर एकत्र येण्यासाठी कारण मिळालं. सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर दोघांनीही 'विजयी सभा' जाहीर केली, जणू काही हा लढा त्यांनीच उभारला होता! ५ जुलै रोजी वरळीच्या डोम मैदानावर ही सभा होणार आहे. पण या तथाकथित एकजुटीला ना मराठी भाषेचं भान आहे, ना मराठी माणसाच्या भविष्याची चिंता. फक्त एकत्र येण्याचं निमित्त हवं होतं, ते मिळालं इतकंच. बरं, इतकं करूनही आतल्या गोटात सध्या गोंधळ आहे तो ‘शेवटी भाषण कोण करणार?’ या मुद्द्यावर! राज ठाकरे हे प्रभावी भाषणांसाठी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121