मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता नावब सैफ अली खानवर (Saif Ali Khan) चाकूने हल्ला केल्याची घटना दि : १६ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री २ वाजता घडली आहे. त्यानंतर सैफ अली खानला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी मुलगा इब्राहिमने सैफला तीन चाकी गाडीमध्ये बसवले. वेळ न गमावण्याच्या भीतीने इब्राहिमने एका अॅटो रिक्षामध्ये बसवले. त्यानंतर अभिनेत्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
रात्री उशीरा हल्लेखोरांनी त्याच्या मणक्यात चाकूने वार केले होते. त्याच्या जखमा दिसत आहेत. रुग्णालयामध्ये सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी सैफ अली खानची सुरक्षा पथकाने सैफ सुरक्षित असल्याचे सांगितले आणि त्याचे कुटुंबही सुरक्षित असल्याची माहिती दिली.
याप्रकरणामध्ये पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान असे दिसून आले की, घुसखोरांनी सैफ अली खानच्या घरात दरोडा टाकण्यासाठी प्रवेश केला होता. सैफच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज पाहिल्यास सुरूवातीला काहीच दिसले नाही. यामुळे हल्लेखोर हा घरामध्ये काम करणाऱ्यांपैकी ओळखीचा असावा, असा पोलिसांनी तर्क लावला. मुंबईमधील सुशिक्षित भागात अशी घटना घडल्याने मुंबई पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहे.
यामुळे आता सेलिब्रिटींच्या मनामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण याआधीही बॉलिवूडचा दंबग अभिनेता सलमान खान याच्या घरावरही गोळीबार करण्यात आला होता. सलमान ही मुंबईतील वांद्रेमध्ये राहतो. त्यानंतर आता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे चिंतेची बाब निर्माण झाली आहे.