मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

    04-Sep-2024
Total Views | 44
 
Shinde
 
लातूर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रशासनाला दिेले आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी पाहणी केली.
 
मराठवाड्यात झालेल्या अतुवृष्टीमुळे तेथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, बुधवारी लातूर दौऱ्यावर असताना जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हेर आणि लोहारा शिवारात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली.
 
हे वाचलंत का? -  "मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं दुकान कायमचं बंद झालंय!"
 
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात झालेल्या नुकसानीची पाहणी केली, तसेच झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्याला निकष दूर सारून शक्य तेवढी मदत नक्की केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121