जन्मठेप नको; दोषींना फाशीच झाली पाहिजे!

22 Aug 2024 13:39:30

Surendra Jain

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP on Ajmer Rape Case)
अजमेरमध्ये १९९२ दरम्यान खादीम आणि माजी काँग्रेस नेते नफीस चिश्ती यांनी शेकडो हिंदू मुलींवर अत्यंत क्रूरपणे सामूहिक अत्याचार केले होते. या भीषण घटनेच्या ३२ वर्षांनंतर अजमेर येथील पॉक्सो न्यायालयाने नफीस चिश्ती, नसीम उर्फ टारझन, सलीम चिश्ती, सुहेल गनी आणि सय्यद जमीम हुसैन यांना दोषी ठरवत ऐतिहासिक निकाल दिला. विश्व हिंदू परिषदेने या निर्णयाचे स्वागत केले असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्व गुन्हेगारांना केवळ जन्मठेपच नाही तर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. विहिंपचे संयुक्त महामंत्री डॉ.सुरेंद्र जैन यांनी याबाबत माहिती दिली. विहिंप पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हे वाचलंत का? : बदलापूर अत्याचार प्रकरणी 'सुमोटो' याचिकेवर सुनावणी सुरु! न्यायालयात काय घडलं?

डॉ.सुरेंद्र जैन म्हणाले की, शंभरहून अधिक पीडित मुलींना न्याय मागण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करत ३२ वर्षे वाट पाहावी लागली, हे किती दुर्दैवी आहे. न्यायाच्या या प्रवासाला वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये अनेक वळणे आली, पण शेवटी सत्याचाच विजय झाला आणि आपल्या हिंदू मुलींवर झालेल्या क्रूर अत्याचारींना शिक्षा झाली; पण तरीही ती अपूर्णच आहे. त्यांना फाशीच व्हायला हवी. जघन्य गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या सहा गुन्हेगारांना झालेली शिक्षा हा आशेचा किरण असून, दोषींना केवळ तुरुंगवासच नाही तर फाशीची शिक्षा होईल, अशी आशा आहे.


काँग्रेसवर निशाणा साधत पुढे ते म्हणाले, "अजमेर दर्गा शरीफचा काळा इतिहास सर्वांसमोर यायला हवा. सलमान चिश्ती देखील फक्त शरियत आणि त्याचे गुरू मोईनुद्दीन चिश्ती यांच्या शिकवणीचे पालन करत होते, हे येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे. ज्यांच्या दर्ग्यात तो 'खादीम' म्हणून काम करत असे. अनेक बलात्कारी हे काँग्रेसचे अधिकारीही आहेत हेही एक प्रस्थापित सत्य आहे. कट्टरतावादी आणि काँग्रेस यांचे जवळचे नाते आहे."

अजमेर दर्गा शरीफ हे हिंदूंच्या क्रूर हत्या आणि अत्याचाराचे प्रतीक असल्याचे सांगत डॉ.सुरेंद्र जैन म्हणाले, "विश्व हिंदू परिषदेने वेळोवेळी हिंदूंना दर्गा शरीफला भेट न देण्याचे आवाहन केले आहे. कारण त्यांचा पैसा खादिमांद्वारे बेकायदेशीर कामांसाठी वापरला जात आहे आणि अजमेर बलात्कार प्रकरण हे त्याचे स्पष्ट उदाहरण आहे. तिथल्याच एका चिश्तीने हिंदूंवर आर्थिक बहिष्कार टाकण्याबद्दलही बोलले होते हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. खादिम कुटुंबीय यापूर्वीही वादात सापडले आहेत, ही बाब लपून राहिलेली नाही. हिंदू शिंपी कन्हैया लालच्या निर्घृण हत्येनंतर अजमेर दर्गा खादिम गौहर चिश्ती याने या घटनेतील एक आरोपी रियाझ अटारी यांची भेट घेतली होती."

"अजमेर दर्ग्याच्या अंजुमन कमिटीचे सरवर चिश्ती यांनी हिंसा भडकवणारे आक्रमक विधान करून संपूर्ण देशाला ‘हादरवून सोडण्याची’ धमकी दिली होती. वृत्तानुसार, सरवर चिश्ती यांनी स्वतःला प्रतिबंधित संघटनेचा (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) सदस्य म्हणून वर्णन केले होते आणि अजमेर दर्ग्यावरील हिंदूंवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. हिंदूंबद्दलचा द्वेष चालू ठेवत सरवर चिश्ती यांचे पुत्र सय्यद अली चिश्ती आणि आदिल चिश्ती यांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केला आणि गौहर चिश्ती यांनी 'सर तन से जुदा' अशी घोषणा देऊन हिंदूंना धमकावले. अजमेर शरीफ दर्ग्याच्या सेवकांच्या संघटनेच्या अंजुमन सय्यद ज़ादगानचे सचिव चिश्ती यांनी आपल्या मुलींबद्दल अपमानास्पद भाषा वापरली होती, हेही आपण विसरता कामा नये.", असे ते म्हणाले. 
Powered By Sangraha 9.0