मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता मशाल चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मशाल चिन्हासारखी दिसणारी सर्व चिन्ह आता वगळण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उबाठा गटाने याबाबत निवडणूक आयोगाकडे पत्र दिले होते.
हे वाचलंत का? - मविआतील बड्या नेत्याकडे सुशांतच्या खुनाचं सीसीटीव्ही फुटेज!
लोकसभा निवडणूकीत लोकांमध्ये मशाल चिन्हाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तो विधानसभा निवडणूकीत होऊ नये म्हणून मशाल चिन्हासारखे दिसणारे सर्व चिन्ह वगळण्यात यावे, अशी विनंती उबाठा गटाने केली होती. याबाबत त्यांनी आयोगाला एक पत्रही लिहिलं होतं. तसेच मतपत्रिकेवर आणि ईव्हीएम मशीनवर मशाल चिन्ह योग्य पद्धतीने दिसावं, अशीही मागणी त्यांनी यात केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केली आहे.