सांगली : सांगलीमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी ४१ फुटाजवळ आली आहे. तसेच दुसरीकडे कोयना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
वाढत्या पाण्याच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना आणि तेथील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
कोयना धरणाच्या विसर्गामुळे आणि पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने चढ उतार होत आहे. दरम्यान मागील आठवड्यात धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कृष्णा , वारणा नदीकाठावरील एकूम ८ हजार ५४४ शेतकऱ्याचे १३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे चांगलेच नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे.
यामध्ये सोयाबिन , उस , भूईमुग , भात भाजीपाला या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना या पुराचा खूप जोरात फटका बसला आहे. यामुळे आता प्रशासन देखील अर्लट झाले आहे. आणि नागरिकांना देखील सतर्क राहणाच्या सुचना दिल्या आहेत.