घरवापसी! धार्मिक बंधनांना कंटाळून झीनत बनली सीमा कश्यप

    08-Jul-2024
Total Views | 61
 Gharvapsi Bareilly UP
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात झीनत (नाव बदलले आहे) हिने हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. झीनत आता मुनेश कुमारची पत्नी झाली आहे. लग्नानंतर वधूने सीमा कश्यप असे नाव धारण केले. आता त्यांचा विवाह बरेली येथील अगत्स्य मुनी आश्रमात वैदिक विधींसोबत अग्नीला साक्षी मानून झाला. लग्नादरम्यान, मुलीने हिंदू देवी-देवतांच्या स्तुतीसह पूजा आणि हवन केले. हा विवाह बुधवार, दि. ३ जुलै २०२४ झाला.
 
घरवापसी केलेली झीनत ही मूळची उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील आहे. तिचे मुनेश कुमारसोबत एक वर्षापासून प्रेम होते. मुनेश हा बरेली जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो अनेकदा मुरादाबादला आपल्या नातेवाईकांना भेटायला जायचा. या नातेवाईकाच्या शेजारी २६ वर्षीय तरुणीचे घर आहे. सुरुवातीला दोघांमध्ये संवाद व्हायचा. एकमेकांशी बोलत असतानाच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
 

मुलीची आई आता या जगात नाही. तिच्या वडिलांना हे नाते पसंत नव्हते. जेव्हा हे प्रकरण नातेवाईकांना माहित झाले तेव्हा झीनतवर सर्व प्रकारचे निर्बंध लादले गेले. तिला फोन वापरण्यावरही बंदी घालण्यात आली होती. झीनतच्या लग्नासाठी मुस्लिम मुलाचा विचार केला जात होता. मात्र, या सर्व छळानंतरही झीनत मुनेशशी लग्न करण्यावर ठाम राहिली. दरम्यान, मुलीचा प्रियकर मुनेश कुमार याने लग्नासाठी प्रयत्न सुरू ठेवले. त्याच्या ओळखीतून त्यांना बरेली येथील अगत्स्य मुनी आश्रमाचा पत्ता मिळाला.
 

बुधवार, दि. ३ जुलै झीनत कशीतरी घराबाहेर पडली. वाटेत त्याला मुनेश भेटला. दोघे मिळून अगत्स्य मुनी आश्रमात पोहोचले. येथील पुजारी पंडित के.के.शंखधर यांनी दोघांची कागदपत्रे तपासली. झीनतने सांगितले की, हे लग्न आणि घरवापसी तिच्या स्वत:च्या इच्छेने होत आहे. याबाबत त्यांनी प्रतिज्ञापत्रही दिले आहे. शेवटी, पंडित के.के. शंखधर यांनी झीनत आणि मुनेश या दोघांचाही वैदिक विधींनुसार विवाह केला. घरवापसी केल्यानंतर तिने आपले नाव बदलून सीमा कश्यप असे ठेवले. लग्नाबाबत झीनत पतीसोबत सासरच्या घरी गेली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121