मरीन ड्राईव्ह-वानखेडेवर लोटला क्रिकेट फॅन्सचा अलोट सागर!

मुंबई लोकल, रस्त्यांवर चाहत्यांची झुंबड! वरुणराजाही स्वागताला

    04-Jul-2024
Total Views | 104
 
Team India
 
मुंबई : वर्ल्ड कप (T-20 World Cup) जिंकल्यानंतर आज टीम इंडिया भारतात दाखल झाली असून अख्खी मुंबई त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. मुंबईमध्ये टीम इंडियाची नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे.
 
टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखो क्रिकेट चाहते नरिमन पॉईंट परिसर, मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर दाखल झाले आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी चाहते उतावीळ झाले आहेत. संपूर्ण वानखेडे स्टेडियम 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' अशा घोषणांनी दुमदुमलं आहे.
 
टीम इंडिया मुंबईत दाखल होण्याच्या कितीतरी वेळेआधीच सर्व चाहत्यांनी गर्दी केली. एवढंच नाही तर मध्येच पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतरही हे चाहते आपल्या जागेवरून हलले नाहीत. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत डबल डेकर ओपन बसमधून टीम इंडियाची विजयी परेड काढण्यात येणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विमानतळापासून तर मरीन ड्राईव्ह रस्त्यापर्यंत सर्व परिसर क्रिकेट प्रेमींनी गजबजलेला आहे. याशिवाय रेल्वे स्थानकांवरदेखील मुंबईकरांनी गर्दी केली आहे.
 
टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर वादळात अडकलेला भारतीय क्रिकेट संघ अखेर चार दिवसांनंतर बार्बाडोस या कॅरेबियन बेटावरून मायदेशी परतला आहे. आज सकाळी टीम इंडिया भारतात दाखल झाल्यानंतर संपूर्ण टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियासोबत विजयोत्सव साजरा केला. त्यानंतर आता मुंबईतही टीम इंडियाचं भव्य स्वागत करण्यात येत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121