...तर उद्धव ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील : चंद्रशेखर बावनकुळे

31 Jul 2024 17:32:40
 
Bawankule
 
मुंबई : देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील, असा खोचक टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
 
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याविरोधात षडयंत्र रचून त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जंगजंग पछाडलं. पण मायबाप जनतेच्या आशीर्वादानं उद्धव ठाकरे देवेंद्रजींना तुरुंगात टाकू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर तर टीका करण्याची ठाकरेंची यांची पात्रताही नाही. त्यामुळे घाम फोडण्याची त्यांची भाषा हास्यास्पद आहे."
 
हे वाचलंत का? -  ब्रेकींग न्यूज! पूजा खेडकरची युपीएससी उमेदवारी रद्द!
 
"उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला, तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न केला. आता त्यांना संपविण्याची अहंकारी भाषा करताहेत, पण त्यांनी लक्षात ठेवावं, तुमचा हाच अहंकार जनता जनार्दन संपविल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्रजींच्या पाठीशी जनता आहे, परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. त्यांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील," असा टोलाही त्यांनी लगावला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0