सिडकोच्या घरांची प्रतीक्षा संपली

3 हजार, 322 घरांची सोडत 16 जुलैला

    10-Jul-2024
Total Views | 59

सिडको
 
नवी मुंबई : बहुप्रतिक्षित नवी मुंबई, तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील 3 हजार, 322 घरांसाठी सोडत जाहीर करण्यासाठी अखेर सिडकोला मुहूर्त मिळाला आहे. या सोडतीची अर्जदार बराच महिन्यांपासून प्रतीक्षा करीत होते. मात्र, सोडतीची तारीख अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आता सिडकोतर्फे घरांची सोडत मंगळवार, दि. 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सिडको भवनात काढण्यात येणार आहे.
 
याबाबतची माहिती देणारे वृत्त शेअर करत सिडकोने ही माहिती दिली आहे. सिडकोने नवीन वर्षात प्रजासत्ताक दिनी 3 हजार, 322 घरांची विक्री योजना जाहीर केली होती. अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. 16 एप्रिल 2024 होती. त्यानंतर दि. 19 एप्रिल रोजी संगणकीकृत सोडत काढण्यात येणार होती. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर दि. 7 जून ही तारीख निश्चित करण्यात आली.
 
पण विधानपरिषदेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे ही तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात आली. आता सोडतीची तारीख विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर म्हणजेच दि. 12 जुलैनंतर निश्चित करण्यात आली आहे. सिडकोची सोडत दि. 16 जुलै रोजी होणार आहे. विजेत्यांच्या नावांची यादी सोडतीनंतर त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाईल. अयशस्वी अर्जदारांना दि. 29 जुलै 2024 रोजी ठेव रकमेचा परतावा मिळेल.
 
सिडकोने नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधली आहेत. मुंबईच्या आजूबाजूच्या भागात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना घर खरेदी करणे कठीण होत आहे. त्यामुळे सिडको स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देते. सिडकोने तळोजा आणि द्रोणागिरी येथील 3 हजार, 322 घरांसाठी लॉटरी काढली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121