देशातील शेकडो हवाईपट्ट्या कार्यान्वित करणार

देशात हवाई वाहतुकीच्या विस्ताराला गती देण्याचा प्रयत्न

    05-Jun-2024
Total Views |

airstrip


नवी दिल्ली, दि.५ : प्रतिनिधी 
देशातील प्रमुख शहरांमध्ये ग्रीनफिल्ड विमानतळ तयार होत असल्याने, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आता टियर II आणि टियर III शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी देशातील शेकडो धावपट्ट्या कार्यान्वित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव वुमलुन्मंग वुअलनाम यांनी बुधवारी 'CAPA इंडिया एव्हिएशन समिट २०२४' मधील उद्घाटन प्रसंगी भाषणात सांगितले की, सरकार सध्या देशात अस्तित्वात असलेल्या ४५३ हवाई पट्ट्यांचे मॅपिंग करण्यात येत आहे आणि या हवाईपट्ट्या कशा कार्यान्वित कराव्या याबाबत विचारमंथन सुरु आहे.

वुअलनाम म्हणाले, आमच्याकडे आधीपासूनच १५७ (विमानतळ) आहेत, जे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे की, आम्ही आमच्या देशात अस्तित्त्वात असलेल्या ४५३ हवाईपट्यांची संपूर्ण माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. भारतात सध्या सुमारे १५७ विमानतळ आहेत, त्यापैकी बहुतांश विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालवले जातात. देशभरात अनेक हवाईपट्या आहेत या अनेक दशकांपासून निष्क्रिय आहेत. त्यापैकी काही देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी कार्यरत होत्या. १०० किमीच्या परिघात कोणत्या विकासाची प्राधान्यक्रमाची गरज आहे, जे अधिक लोकसंख्येला सेवा देतात किंवा अधिक औद्योगिक विकास क्षेत्रांना सेवा देतात. या हवाई पट्ट्या पुनुरुज्ज्वीत करण्याआधी मंत्रालय विविध पैलूंचे मूल्यांकन करत आहे. त्यावर प्रकाश टाकत आहे.
आम्ही या हवाई पट्ट्यानां ब्राउनफील्ड प्रकल्प म्हणून विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून पाहतो किंवा आम्ही संरक्षण हवाई क्षेत्राकडे देखील पाहतो. संयुक्त वापरकर्ता विमानतळाची भारतामध्ये लक्षणीय संख्या आहे. याचा फायदा आहे. परंतु उपलब्ध एअरटाइममध्ये त्यांच्या उपलब्धतेमध्ये काही अडथळे देखील आहेत. देशाच्या विविध भागांशी कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी सरकार आगामी २५ वर्षांच्या दृष्टीकोनातून या हवाई पट्टीच्या विकासाकडे पाहत असल्याचे वुलनाम यांनी स्पष्ट केले.