मुंबई:भारतीय मसाल्याच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही देशांनी भारताच्या मसाल्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. मात्र भारतीय अन्न सुरक्षा महामंडळाने ' क्लिन चीट' दिल्याने मसाला उत्पादकांना दिलासा मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतीय मसाल्याच्या उत्पादन निर्यातीत वाढ होत ही निर्यात ४.४६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. वाढलेल्या मागणीमुळे तसेच वाढलेल्या निर्यात क्षमतेमुळे व वाढलेल्या मसाल्याच्या किंमतीमुळे ही वाढ झाली आहे.
प्रामुख्याने गेल्या काही दिवसांपासून मिरपूड, वेलची, हळद यांच्या किमतीत वाढ झाली होती. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मसाला महामंडळाच्या आकडेवारीनुसार, मसाल्याच्या निर्यातीत वाढ झाली आहे. ही वाढ १५३९६९२ टनांपर्यंत पोहोचली असून याचे एकूण मुल्यांकन २६९५८.८० कोटी रुपये आहे. लाल मिरचीच्या निर्यातीत नवा विक्रम झाला आहे. ही वाढ १.५ अब्ज डॉलर्सपर्यंत झाल्याने इयर ऑन इयर बेसिसवर १५ टक्क्यांनी वाढली आहे.
ही वाढ १.३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. मुख्यतः बांगलादेश व चीनमधील मसाल्याच्या वाढत्या मागणीमुळे ही संख्या भारताला गाठता आलेली आहे. लाल मिरचीच्या निर्यात ही भारताच्या एकूण मसाला निर्यातीतील ३४ टक्के आहे. चीन हा भारताचा सर्वात मोठा आयातदार असून भारतातून १.७९ लाख टन मिरचीची निर्यात होते. बांगलादेशच्या निर्यातीत वाढ झाली आहे. ही वाढ ६७ टक्क्यांनी वाढत मागील वर्षी ५३९८६ टनवरुन वाढत ९०५७० टनवर पोहोचली आहे