सरत्या हंगामात कांद्याच्या दरात उसळी

    11-Jun-2024
Total Views | 47

कांदा
नाशिक : रुपये दर लासलगाव २७५२ , वणी २,९०० सरत्या उन्हाळी हंगामात आवक घटल्याने कांद्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात क्विंटलला 2 हजार रुपये असलेला दर आता वाढत असून सोमवार, दि. 10 जून रोजी दुपारपर्यंत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 हजार 752, तर दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असलेल्या वणी येथे 2 हजार 900 रुपयांचा दर शेतकर्‍यांना मिळाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.
 
साधारणपणे जून संपेपर्यंत कांदा चाळीत साठवलेला कांदा शेतकरी विकून मोकळा होतो. नाहीतर, कांद्याला कोंब फुटायला सुरुवात होते. कोंब फुटलेला हा कांदा मातीमोल भावाने विकावा लागतो. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांद्याची विक्री करतात. यंदा दुष्काळ असल्यामुळे कांदा लागवड खूप कमी झाली होती. त्यामुळे जूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटलेली दिसून येत आहे. तसेच चाळींमध्येदेखील साठवण्यात आलेल्या कांद्याचे प्रमाण कमी होते. कांदाकाढणीच्या वेळी खूपच कमी दर कांद्याला मिळाला होता.
 
त्यामुळे खर्च भरून निघेल की नाही, हा प्रश्न कांदा उत्पादक शेतकर्‍यांना पडला होता. मात्र, साठवलेल्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने खरीप हंगामाचा खर्च यावर करता येणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने खरीप हंगामातील पिकेसुद्धा जोरदार येण्याची शक्यता असल्याने बळीराजाला सुगीचे दिवस येणार आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा
महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा

महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा 'परिवार उत्सव' कार्यक्रम संपन्न

"वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहील्यानंतर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे गुरुवार, दि. १७ जुलै रोजी 'परिवार उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे 'भारत पॅव्हेलियन'चे करणार उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या १८ जुलै २०२५ रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कथाकथनाची..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121