मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि. ७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजतापासून सूरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात एकूण अकरा मतदारसंघात मतदान सुरु आहे. दरम्यान, सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
लातूर - ७.९१ टक्के
सांगली - ५.८१ टक्के
बारामती - ५.७७ टक्के
हातकणंगले - ७.५५ टक्के
कोल्हापूर - ८.०४ टक्के
माढा - ४.९९ टक्के
उस्मानाबाद - ५.७९ टक्के
रायगड - ६.८४ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-८.१७ टक्के
सातारा - ७.०० टक्के
सोलापूर - ५.९२ टक्के