मुंबई : राज्यात आज दि. ७ मे २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ .५५ टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
लातूर - ३२.७१ टक्के
सांगली - २९.६५ टक्के
बारामती - २७.५५ टक्के
हातकणंगले - ३६.१७ टक्के
कोल्हापूर - ३८.४२ टक्के
माढा - २६.६१ टक्के
उस्मानाबाद - ३०.५४ टक्के
रायगड - ३१.३४ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ३३.९१ टक्के
सातारा - ३२.७८ टक्के
सोलापूर - २९.३२ टक्के