सुदर्शन वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, विकी नावाच्या तरुणावर हा हल्ला जालन्यातील परतूर भागात झाला. पीडित तरुण एका हॉटेलमध्ये आपल्या भावासोबत बसून जेवण करत होता. त्याचवेळी त्याला फोन आला. फोनवर 'जय श्री राम' रिंगटोन वाजली. त्या रिंगटोनमुळे धर्मांधांचा जळफळाट झाला आणि त्यांनी हिंदू मुलावर जीवघेणा हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
यापूर्वी बेंगळुरूमध्ये मुकेश नावाच्या एका हिंदू दुकानदाराला त्याच्याच दुकानात हनुमान चालीसा वाजवल्यामुळे धर्मांधांनी मारहाण केली होती. अजानच्या वेळी तो हिंदू भजन वाजवत असल्याने धर्मांधांनी त्याला बेदम मारहाण केली होती.