मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha elections) पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु असून सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, दुपारी १ वाजेपर्यंत एकुण १३ मतदारसंघांमध्ये सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे. यावेळी कल्याणमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे:
धुळे - २८.७३ टक्के
दिंडोरी - ३३.२५ टक्के
नाशिक - २८.५१ टक्के
पालघर - ३१.०६ टक्के
भिवंडी - २७.३४ टक्के
कल्याण - २२.५२ टक्के
ठाणे - २६.०५ टक्के
मुंबई उत्तर - २६.७८ टक्के
मुंबई उत्तर-पश्चिम - २८.४१ टक्के
मुंबई उत्तर-पूर्व - २८.८२ टक्के
मुंबई उत्तर-मध्य - २८.०५ टक्के
मुंबई दक्षिण-मध्य- २७.२१ टक्के
मुंबई दक्षिण - २४.४६ टक्के