मुंबई-गोवा महामार्ग, मराठीला अभिजात दर्जा यांसह राज ठाकरेंच्या मोदींकडून सहा अपेक्षा!

17 May 2024 20:50:07
Raj Thackeray's expectations from Modi

मुंबई (विशेष प्रतिनिधी)
: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यादा पंतप्रधान बनणारे नरेंद्र मोदी, असा उल्लेख करत राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तीन टप्प्यात मी बोलणार, असे म्हणत राज ठाकरे यांनी राम मंदिर, कलम ३७०, तिहेरी तलाक यांसारख्या महत्त्वकांशी निर्णयाचे स्वागत केले. राम मंदिर झाल्यानंतर शरयू नदीत फेकून दिलेल्या कारसेवकांच्या मृतात्म्याला शांती मिळाली. तिहेरी तलाक रद्द करत मुस्लीम भगिनींना न्याय दिला. याच प्रकारे कलम ३७० हटवून तो भाग मोदींनी काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे अधोरेखित करुन टाकलं, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रासाठी सात अपेक्षा व्यक्त केल्या. पहिली म्हणजे अनेक वर्षे खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, ही मागणी त्यांनी केली. दुसरी म्हणजे या देशावर १२५ वर्षे हे मराठेशाहीचे राज्य होते. हा इतिहास देशभरातील शालेय अभ्यासक्रमात सामाविष्ट करावा, अशी दुसरी मागणी त्यांनी केली.'शिवस्मारक' कधी होईल ते माहीत नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्यांवर खर्च व्हावा आणि त्यांना पूर्ण वैभव मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. तिसरे म्हणजे कित्येक वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग हा वेळेत पूर्ण व्हावं अशी मागणी त्यांनी केली.

चौथे आणि महत्त्वाचे म्हणजे संविधानाबद्दल वारंवार बदलणार म्हणून अपप्रचार केला जातोय त्याबद्दल विरोधकांना ठणकावून सांगावे की यात काही बदल होणार नाही. पाचवी देशात अराजक माजवू पाहणाऱ्या आणि ओवैसी सारख्या औलादिंच्या मागे फिरणाऱ्यायाचे अड्डे एकदाचे ध्वस्त करा जेणेकरून आमच्या माताभगिनी सुरक्षित राहतील, अशी मागणी त्यांनी केली. सहावी आणि शेवटची मागणी म्हणजे मुंबईकरांची लाईफ्लाईन असलेल्या रेल्वेला भरभरून निधी द्यावा आणि पायाभूत सुविधांचा विकास करावा, अशी अपेक्षा त्यांनी केली.

Powered By Sangraha 9.0