भारतातील हिंदुत्वाला विरोध करणारे सर्व हिंदूद्वेषी या समाजात नास्तिक, बुद्धिवादी, तत्त्वज्ञानी, समाजसुधारक, राजकीय नेते, तथाकथित मसिहा सनातन धर्मातील दोष काढण्यासाठी अशा विविध भूमिका निभावतात. सनातन धर्म आणि त्याची शिकवण जाणून घेण्यासाठीही लोक योग्य आहेत का? मुस्लीम आणि इतर हिंदू विरोधकांची मान्यता मिळवण्यासाठी ते हिंदुत्वाच्या श्रद्धांना बदनाम करण्यास आणि हिंदू देवतांचा अपमान करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्वाशी सामना करण्याची सर्व आशा गमावली आहे. आता त्यांचे मनोधैर्य खचले असून, पंतप्रधान मोदींना सत्तेवरुन दूर करणे त्यांच्यासाठी दिवसेंदिवस कठीण होताना दिसते. विकास, सुशासन आणि कायदा आणि सुव्यवस्थेला चालना देण्यासाठी लोक पंतप्रधान मोदींना मतदान करत आहेत. मात्र, विरोधी पक्षांना हे सत्य समजू शकलेले नाही. कारण, ते छद्म धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनातून सर्व पाहत आहेत. ज्या नागरिकांनी पंतप्रधान मोदींना मतदान केले, त्यांना ‘हिंदुत्वावर विश्वास ठेवणारे’ म्हणत आहेत. कारण, त्यांना ‘हिंदुत्व’ म्हणजे नेमके काय ते कळत नाही आणि ते समजून घेण्याची त्यांची इच्छाही नाही.
हिंदूविरोधी नेतमंडळी त्यांच्या हिंदुत्वावरील हल्ल्यांमध्ये अतिशय परिष्कृत आहेत, जणू ही विचारधारा मानवतेच्या आणि हिंदूंच्याच विरोधात आहे, परंतु हे तत्सम खोटे आहे. उलट, ही विचारधारा हिंदू संस्कृती, धर्म आणि मानवतेचे रक्षण करते. पहिली गोष्ट म्हणजे हिंदुत्व हा ना नरेंद्र मोदींचा राजकीय अजेंडा आहे ना रा. स्व. संघाचा. ही प्रत्येक भारतीयाची मुळी ओळख आहे. तुमची स्वतःची ओळख स्वीकारणे म्हणजे सर्वांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणारा आणि प्रस्थापित तथ्यांवर आधारित असलेल्या मार्गाचे अनुसरण करणे. तसेच तुम्ही कोण आहात, याच्याशी सहजतेने वागणे आणि स्वीकारणे. पंतप्रधान मोदी आणि रा. स्व. संघ आम्हाला फक्त आठवण करून देत आहेत, जे आम्ही विसरलो होतो. त्यामुळे हिंदुत्वाचा अर्थ अतिरेकी किंवा दहशतवाद असा दुरान्वयानेही होत नाही, जसे की काही तथाकथित धर्मनिरपेक्ष भारतीय, काही बॉलिवूड सेलिब्रिटी, अनेक विरोधी पक्ष, विशेषत: घराणेशाही पक्ष आणि काही माध्यमे दावा करतात. हिंदुत्वाचा अर्थ अल्पसंख्याकांना नापसंत करणे, असा तर अजिबात नाही. हिंदुत्व हे सर्व भारतीयांसाठी आहे, मग ते कोणत्याही धर्माचे असो, जे भारताच्या उभारणीसाठी सनातन संस्कृतीच्या मूल्यांना स्वीकारतात, त्यांचे कौतुक करतात आणि योग्य पद्धतीने आपल्या चालीरीती न बदलता अमलात आणतात, ते सगळेच या हिंदुत्वाचा व्यापक भाग आहेत.
स्वार्थासाठी हिंदूंना कसे लक्ष्य केले जात आहे?
भारतातील हिंदुत्वाला विरोध करणारे सर्व हिंदूद्वेषी या समाजात नास्तिक, बुद्धिवादी, तत्त्वज्ञानी, समाजसुधारक, राजकीय नेते, तथाकथित मसिहा सनातन धर्मातील दोष काढण्यासाठी अशा विविध भूमिका निभावतात. सनातन धर्म आणि त्याची शिकवण जाणून घेण्यासाठीही लोक योग्य आहेत का? मुस्लीम आणि इतर हिंदू विरोधकांची मान्यता मिळवण्यासाठी ते हिंदुत्वाच्या श्रद्धांना बदनाम करण्यास आणि हिंदू देवतांचा अपमान करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.हा काही लोकांचा अजेंडा आहे, ज्यांना त्यांच्या घराणेशाहीच्या राजकारणासाठी राजकारणात टिकून राहण्याची गरज आहे आणि ‘संघी’ किंवा ‘भक्त’ हा असा शब्द आहे, जो कोणत्याही अस्सल हिंदूला लाजवण्यासाठी वापरला जातो. जेव्हा कोणताही समूह, मीडिया चर्चेत किंवा सार्वजनिक रॅलीत असे म्हटले जाते, तेव्हा ‘संघी’ किंवा ‘भक्त’ हा शब्द कोण म्हणतो ते पाहा, मग ते इतर कोणत्याही धर्माचे असो की, आपली संस्कृती आणि परंपरा बदनाम करून आपला उदरनिर्वाह करणारा हिंदू असो.
सातत्यपूर्ण प्रयत्नांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हळूहळू हिंदूंना त्यांचा धर्म, लोक आणि मातृभूमीबद्दल त्यांचे हक्क आणि जबाबदार्यांबद्दल जागृत करीत आहेत. ते हिंदूंना शिक्षित करत आहेत की, डाव्या-अब्राहमिक युतीने त्यांना कसे कोपर्यात टाकले आहे आणि त्यांना त्यांच्याच देशात दुसर्या दर्जाच्या नागरिकांसारखे वागवले आहे. अनेक हिंदूंना याची जाणीव झाली आहे आणि ते त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल निर्देशित केलेल्या कट्टरता आणि द्वेषाच्या विरोधात बोलण्यासाठी हळूहळू उभे राहिले आहेत. त्यामुळेच आपल्या देशात वाढत्या असहिष्णुतेबद्दल खूप चर्चा होताना दिसते. तथापि, त्यापैकी एक मोठा भाग एकतर उदासीन आहे किंवा डाव्या-अब्राहमिक चळवळीच्या धर्मनिरपेक्ष-उदारमतवादी प्रचाराने प्रभावित झाला आहे.
बहुसंख्य हिंदूंना (खोटे) धर्मनिरपेक्षता लाभदायक आहे, असे मानण्यास शिकवले जाते. इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मात धर्मनिरपेक्षतेची कोणतीही संकल्पना नाही. कारण, ते एकेश्वरवादी धर्म आहेत, जे देवापर्यंत पोहोचण्याचा आणि इतर सर्व नाकारण्याचा एकच मार्ग मानतात.
१९४७ पासून, धर्मनिरपेक्ष राजकारण्यांनी हिंदू मतांचे विभाजन करून मुस्लीम मते एकत्र करण्याचा प्रयत्न केला, एक डाव त्यांनी अल्पसंख्याकांकडून अनपेक्षित २० टक्के मते मिळविण्यासाठी वापरला, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन की हिंदूंची जात, प्रांत, प्रदेश, राज्य, भाषेच्या आधारावर विभागणी केली जाऊ शकते. परंतु, पंतप्रधान मोदींनी शीख, बौद्ध आणि जैन यांसारख्या सर्व भूमिपुत्र धर्मांसह हिंदू मतांचे एकत्रीकरण करून उलट केले, म्हणूनच आज विरोधी पक्ष संघर्ष करत आहेत. काँग्रेसची धर्मनिरपेक्षता एकतर्फी आहे. हिंदूंवर, त्यांच्या संस्कृतीवर आणि इतिहासावर त्यांचे नेते ज्याप्रकारे हल्ले करत आहेत, त्यावरून इतर धर्मांची स्तुती करताना, हिंदुत्वाला बदनाम करण्याची इच्छा दिसून येते. राहुल गांधींची शक्ती टिप्पणी हिंदूंचा विश्वास असलेल्या महिला सबलीकरणाच्या स्थितीबद्दल त्यांचा द्वेष दर्शवते का? सनातन धर्म स्त्रियांना देवी मानतो आणि त्यांना समानतेने वागवतो. मग, हा काँग्रेस नेत्याचा हिंदू महिलांवर हल्ला आहे, असा निष्कर्ष काढता येईल का? भारतमाता की जय आणि ‘जय श्रीराम’ वरील हल्ला ही त्यांची हिंदू ऐक्याबद्दलची भीती, अज्ञान आणि तिरस्कार दर्शवते.
देशाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्याविशेषत: हिंदूंना कमकुवत करण्यासाठी विचारात आणलेल्या संपत्ती वितरण प्रणालीचा विचार करताना दिसून येणारी विध्वंसक मानसिकता हलक्यात घेतली जाऊ नये. ‘संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे’ हे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे विधान बहुतेकांना आठवते. बनावट आर्य आक्रमण सिद्धान्ताने निर्माण केलेली उत्तर-दक्षिण विभागणी आधीच वैज्ञानिक, पुरातत्त्व आणि ऐतिहासिक माहितीद्वारे नष्ट केली गेली आहे, तरीही ती राजकीय हेतूंसाठी वापरली जात आहे. भारताचे तुकडे करणार्या या विघातक मानसिकतेविरुद्ध मतदारांचा रोष मतमोजणीच्या दिवशी दिसून येईल.
विरोधी पक्षांना हिंदू एकता आणि समरसता याबद्दल चिंता आणि भीती निर्माण झाली आहे. कारण, ही एकता देशाच्या विकासाला चालना देत आहे आणि सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या देशाला मजबूत करत आहे. आपल्या देशाला ‘विश्वगुरू’ बनवणारा मार्ग विरोधी पक्षांना त्रासदायक ठरतोय का? त्यांना अजूनही हिंदूंनी वसाहतवादी (गुलामगिरी) मानसिकता जपायला हवी आहे, असे वाटते का? जाती-धर्माच्या आधारावर हल्ला करण्यापेक्षा समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाबरोबरच देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणे, ही विरोधी पक्षांची निवडणूक लढवण्याची आदर्श रणनीती असली पाहिजे. सनातन धर्म कधीही कोणत्याही धर्माला किंवा पंथाला विरोध करत नाही; हे सर्वांच्या फायद्याचे आहे. त्यामुळे भ्रष्ट राजकारणाऐवजी राष्ट्रासाठी मतदान करा!
पंकज जयस्वाल