उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गात यावं परत कसे जाता ते दाखवतो : नारायण राणे

23 Apr 2024 15:28:37

Narayan Rane

(Narayan Rane - File photo)

रत्नागिरी : "मुख्यमंत्री असूनही महाराष्ट्रासाठी काहीही करू न शकलेला अपयशी नेता महाराष्ट्राला मागे नेणारा होता. तोच तोच चुकीचा जूना इतिहास सांगून अपशब्द वापरणारा हा माणूस कोडगा आहे. सत्ता गेल्याने डोळ्यासमोर ४० आमदार सोडून गेल्याने हा माणूस भविष्याच्या अपयशाने आणि चिंतेने वैफल्यग्रस्त आहे. बाळासाहेबांनी शिवसेना पक्ष निर्माण केला आणि देशभर पोहोचवला त्यांच्यानंतर पक्ष संपवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले.", अशा शब्दांत नारायण राणेंनी भर सभेत ठाकरेंचा समाचार घेतला.

देवेंद्र फडणवीसांबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचाही राणेंनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. "देवेंद्रजींबद्दल बोलतोयसं, तु सिंधुदुर्गात ये आणि असे शब्द फक्त बोलून दाखव, मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो", अशा शब्दांत त्यांना इशारा दिला आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. तुझ्यासारखं आम्ही सगळं सोडलेलं नाही. कोकणाला अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना काय दिलं याचं उत्तर त्यांनी द्यावं, असे आवाहनही ठाकरेंनी राणेंनी केले.


Powered By Sangraha 9.0