टोयोटा किर्लोस्कर वाहनांची मार्चमध्ये रेकॉर्ड ब्रेक विक्री !

२०२३ तुलनेत मार्च २०२४ मध्ये २१७८३ युनिट्सवरून २२९१० युनिट्सची विक्री

    01-Apr-2024
Total Views | 87
 
Toyota
 
 
मुंबई: टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या वाहन विक्रीत वाहनांची रेकोर्डब्रेक युनिट विकली गेली आहेत. मार्च महिन्यात होलसेलमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या डिसपॅच केलेल्या युनिट्स मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत ही वाढ २५ टक्क्याने वाढली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, मार्च २०२३ तुलनेत मार्च २०२४ मध्ये २१७८३ युनिट्सवरून २२९१० युनिट्सची विक्री कंपनीकडून करण्यात आली आहे. 
 
आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये कंपनीने ४८ टक्क्याने अधिक युनिट्सची विक्री केली आहे. आर्थिक वर्ष २२-२३ मधील १७७६८३ युनिट विक्रीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये २६३५१२ युनिट्सची विक्री कंपनीने नोंदवली आहे.
 
या विक्रीबाबत प्रतिक्रिया देताना, 'आम्ही २०२३-२४ आर्थिक वर्ष आणि मार्च २०२४ साठी अनुक्रमे २६३५१२ आणि २७१८० च्या सर्वोच्च युनिट्सची नोंद करून आमच्या दोन्ही घाऊक विक्री बंद केल्याबद्दल रोमांचित आहोत," टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) उपाध्यक्ष, विक्री-सेवा-वापरलेल्या कार व्यवसाय साबरी मनोहर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
 
ग्राहकाभिमुख दृष्टीकोन ठेवून, विविध ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा आणि बाजारपेठेतील ट्रेंडचे आकलन करण्यात, समजून घेण्यात कंपनी नेहमीच पुढे राहिली आहे, त्यांना आमच्या दर्जेदार उत्पादने आणि सेवांच्या विस्तृत श्रेणीसह सर्वोत्तम सेवा देण्यात आली आहे, असेही ते पुढे म्हणाले.
 
टोयोटा किर्लोस्कर ही टोयोटा मोटर्स कॉर्पोरेशनची भारतीय कंपनीचे युनिट आहे. कंपनीचे सध्या दोन उत्पादन प्रकल्प भारतात सुरू आहे. भविष्यात अजून एक युनिट सुरू करण्यासाठी कंपनीच्या हलाचाली सुरु आहेत. सध्याच्या दोन युनिटची वाहन उत्पादक क्षमता एकत्रितपणे ३.४२ लाख युनिट्स पर्यंत आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121