"मदरशांमुळे मुस्लीमांचे आयुष्य अंधारमय"

06 Mar 2024 15:33:25
madrsa 
 
कोची : मलाप्पुरम लोकसभा मतदारसंघातून भाजपने केरळमधून अब्दुल सलाम यांना उमेदवारी दिली आहे. ते कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू राहिले आहेत. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे अब्दुल सलीम पंतप्रधान मोदी यांच्या कार्याने प्रभावित आहेत. अब्दुल सलाम म्हणाले की, "पंतप्रधान मोदींनी देशातील अल्पसंख्याकांसाठी जेवढे काम केले तेवढे कोणी केले नाही."
 
अब्दुल सलाम यांनी सौदी अरेबियापेक्षा भारतात मुस्लिम अधिक सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. अब्दुल सलाम यांनी केरळमधील मुस्लिमांच्या मनात भरलेली नकारात्मकता दूर करणे हा त्यांचा उद्देश असल्याचे सांगितले. न्यूज १८ शी बोलताना मलप्पुरममधील भाजपचे उमेदवार अब्दुल सलाम म्हणाले, “मुस्लीम अल्पसंख्याकांच्या मनात पंतप्रधान मोदींचा प्रकाश आणणे हे माझे पहिले काम आहे.”
 
हे वाचलंत का? -  ६ अल्पवयीन मुलींवर बलात्कार; 'मौलवी मेहंदी शेख'ला कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
 
अब्दुल सलाम म्हणाले की, "केरळमधील मुस्लिम एका वेगळ्या युगात जगत आहेत. अतिशय मजबूत नेटवर्क असलेल्या मदरशांमधून त्यांना मार्गदर्शन मिळते. मी त्यांचे जीवन पीएम मोदींच्या विकासाच्या प्रकाशाने भरवणार आहे. मी त्यांना सांगेन की तुम्ही अंधारात जगत आहात, जे खरंच नाही. उलट तुमच्या आजूबाजूला असे वातावरण निर्माण केले आहे की तुम्ही भ्रमात रहा. वास्तविकता अशी आहे की पंतप्रधान मोदींनी देशातील मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या विकासासाठी बराच वेळ आणि पैसा दिला आहे."
 

Abdul Salim 
 
अब्दुल सलाम म्हणाले की, भारतात अल्पसंख्याक सर्वात सुरक्षित आहेत. ते म्हणाले, “जगातील कोणत्याही देशापेक्षा भारतातील मुस्लिमांना अधिक स्वातंत्र्य आहे. सौदी अरेबियातील मुस्लिमांपेक्षा इथल्या मुस्लिमांना जास्त स्वातंत्र्य आहे. येथील अल्पसंख्याक आपले विचार मांडू शकतात. आपल्या धर्माचा विस्तार करू शकतो. लोकशाही स्वातंत्र्य जगू शकतो. ते म्हणाले की, विरोधी इंडी आघाडी केवळ अपप्रचार करत आहे.
 
हे वाचलंत का? -  "गैर मुस्लीमांशी बोलू नका, शरियाचे पालन करा अन्यथा..." - कट्टरपंथी संघटनेची धमकी
 
अब्दुल सलाम हे कालिकत विद्यापीठाचे कुलगुरू राहिले आहेत. अब्दुल सलाम हे देशातील सर्वात शिक्षित नेत्यांपैकी एक आहेत, ते केरळ कृषी विद्यापीठात प्राध्यापकही राहिले आहेत. अब्दुल सलाम यांनी आतापर्यंत १५३ शोधनिबंध लिहिले आहेत, त्यांनी लिहिलेल्या १५ पुस्तकांचे प्रकाशन देखील झालेले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0