मुंबई : राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु आहे. सर्वच पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, वरळी विधानसभा मतदारसंघात वरळीकरांकडून पोस्टबाजी करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत बदल घडवणार अशा आशयाचे पोस्टर याठिकाणी लावण्यात आले आहेत.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आमदार आहेत. दरम्यान, याठिकाणी वरळीकरांनी पोस्टरबाजी केल्याचे सांगण्यात येत आहे.
"आमचे नशीब बदलणार दक्षिण मुंबईत यंदा बदल घडविणार" अशा आशयाचे पोस्टर वरळीमध्ये लावण्यात आले आहे. याशिवाय त्याखाली "आम्ही वरळीकर" असेदेखील लिहिण्यात आले आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात असे पोस्टर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.