अमोल कीर्तिकर यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स

    29-Mar-2024
Total Views | 42
Amol Kirtikar ed Summons


मुंबई : 
 उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तथा उबाठा गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहेत. ८ एप्रिल रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेकडून स्थलांतरीत मजुरांना तांदूळ आणि मसूरची खिचडी तयार करुन वाटप करण्यात आले होते. ५२ कंपन्यांना दिलेल्या कंत्राटानुसार चार महिन्यांत चार कोटी खिचडी पाकिटांचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.


हे वाचलंत का? - काँग्रेस हा समंजस पक्ष, आता दिल्लीत चर्चा होणार नाही!


यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी करीत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार प्राथमिक तपास करीत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणात ६ कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला होता.
 
काँग्रेसकडून कीर्तिकरांच्या उमेदवारीला विरोध!

शिवसेना (ठाकरे गट)कडून मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तिकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात मविआकडून जागावाटप करण्यात आले असून अद्याप काही जागांवर एकमत होणं अजून बाकी आहे. दरम्यान, कीर्तिकरांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस पक्षाकडून जोरदार विरोध करत नाराजी व्यक्त करण्यात आली. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तर खिचडी घोटाळ्यातील आरोपीला आमच्या डोक्यावर थोपविले जात आहे, असे सांगत खिचडी चोराला आपण कधीच समर्थन करणार नाही अशी रोखठोक भूमिका जाहीर केली.


अग्रलेख
जरुर वाचा
महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा

महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा 'परिवार उत्सव' कार्यक्रम संपन्न

"वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहील्यानंतर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे गुरुवार, दि. १७ जुलै रोजी 'परिवार उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे 'भारत पॅव्हेलियन'चे करणार उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या १८ जुलै २०२५ रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कथाकथनाची..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121