गुलजारांच्या उपस्थितीत मुंबईत गुजराती साहित्य संमेलन

22 Mar 2024 13:39:30


sahitya 
 
मुंबई : व्यास प्रकल्प आयोजित "समकालिन भारतीय साहित्य: आचमन, आस्वाद, विमर्श" हा तीन दिवसीय कार्यक्रम दि. 29,30, 31 मार्च रोजी भारतीय विद्या भवन, अंधेरी येथे होत आहे. या कार्यक्रमात गुलजार यांच्यासोबतच माधव कौशिक, सरिता जोशी, प्रतिभा रे, कुंदन व्यास, अरुण कमल, अतुल दोडिया, चंद्रकांत पाटील, वसंत आबाजी डहाके, अनिल जोशी, दिलीप झवेरी, प्रबोध पारीख, उदयनजी आदी मान्यवर कलाकार आणि लेखक सहभागी होणार आहेत. ठक्कर, मनोज शहा, सौम्या जोशी आणि इतर अनेक मान्यवर वक्ते सुद्धा उपस्थित असतील.
 
हा कार्यक्रम फरबास गुजराती सभेचे माजी अध्यक्ष, जागतिक साहित्याचे आजीवन वाचक आणि गुजराती साहित्य आणि भारतीय समाजाच्या अनेक संस्थांचे उदार संरक्षक स्वर्गीय बलवंतभाई पारेख यांच्या जन्मशताब्दी साजरे करण्याचा एक प्रसंग आहे. तरीही सर्व साहित्य रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून गुलझार यांचे मनोगत ऐकण्यासाठी यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0