मुंबई: बुधवारी 'स्टार्टअप महाकुंभ' या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप हा देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी महत्वाचा कणा असेल हे महत्वपूर्ण विधान केले आहे. बुधवारी सकाळी या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्टार्टअपची महती त्यांनी समजावून सांगितली.
'जर भारताला ५ ट्रिलियन डॉलर्स जीडीपी असलेली अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत बनवायची असेल तर स्टार्टअपची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. वाणिज्य मंत्रालयाने स्टार्टअप महाकुंभ हा कार्यक्रम नवे उद्योग व उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ठेवला होता.
'भारत हे जगातील तिसरे स्टार्टअप इकोसिस्टीम असणारा देश आहे ज्यामध्ये १.२५ लाख स्टार्टअप असून १२ लाखांहून अधिक मनुष्यबळ या प्रकाराशी संलग्न असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.स्टार्टअप धोरणावर भाष्य करताना पंतप्रधान मोदींनी 'सरकारच्या सकारात्मक स्टार्टअप धोरणामुळे स्टार्टअप इकोसिस्टीमची देशात वाढ झाल्याचे' यावेळी नमूद केले.
स्टार्टअप हे भारतातील 'सोशल कल्चर' झाले असुन या प्रगतीला रोखता येणार नाही. छोट्या शहरात गावात देखील ही औद्योगिक क्रांती होत आहे.अग्रीकल्चर,टेक्सटाईल,ट्रान्सपोर्ट,स्पेस,योगा,आयुर्वेद अशा विविध आघाड्यांवर भारतात औद्योगिक प्रगती होत असल्याचे सांगितले आहे.
भारत सरकारने औद्योगिकीकरण व उद्योजकांना विशेषतः स्टार्टअपला प्रेरणा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये उद्योजक, गुंतवणूकदार, तज्ञ, इंडस्ट्रियल खेळाडू, व्यापारी, व मान्यवर यांच्या एकत्रित प्रयत्नांतून नव्या नव्या संकल्पना समोर आणाव्यात व नेटवर्किंग मार्फत उदयोन्मुख उद्योजकांना पाठिंबा मिळावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी २००० स्टार्टअप, १००० गुंतवणूकदार, ३०० इनक्यूबेटर, १०० युनिकॉर्न इत्यादी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,या कार्यक्रमात ४० स्टार्टअपकडून त्यांच्या नव्या संशोधनाचे प्रात्यक्षिक या कार्यक्रमात दाखवले गेले. डायनॅमिक स्टार्टअप इकोसिस्टममध्ये वाढ आणि यश वाढवण्याच्या उद्देशाने स्टार्टअप्सना अमूल्य अंतर्दृष्टी, व्यावहारिक ज्ञान आणि नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा मास्टरक्लास तयार करण्यात आला आहे.