"ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांची घरं फोडली, त्यांना आपल्या..."
09-Feb-2024
Total Views |
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे पेरलं तेच उगवतय अस म्हणत तुफान टोलेबाजी केली आहे. नुकतेच राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निकाल निवडणुक आयोगाने सुनावला आहे. त्याच्या पार्श्वभुमीवर त्यांनी शरद पवारांवर टिका केली.
"शरद पवारांनी लोकांची घरं फोडली त्याच फळ आता त्यांना मिळत आहे. जे रामाचं अस्तित्व शोधत होते, ते आज स्वतःचं अस्तित्व शोधत आहेत!" अस वक्तव्य त्यांनी केलं शरद पवारांनी पहील्यापासुनच महाराष्ट्रात फोडा फोडीच राजकारण केलं. कोणतीही विचारधारा त्यांच्या राकारणाला नव्हती. फक्त काही लोकांना एकत्र करायच काही नेते एकत्र करायचे आणि त्याला पक्ष म्हणायच हेच त्यांनी केल आहे असही पडळकर पुढे म्हणाले
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.