चरैवेति,चरैवेति

    10-Feb-2024
Total Views |
shri ram mandir

रामशीलेची पूजा करायची आणि राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येला पाठवायची योजना आखली गेली. संपूर्ण भारतभर व्यापक जनसंपर्क आणि जनजागृती झाली. २ लाख, ७५ हजार गावांमध्ये सहा कोटी लोकांनी रामशीलेचे पूजन केले. संपूर्ण देश राममय झाल्याचे दिसत होते. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक ताकदीपेक्षा किंवा जनसंपर्कापेक्षा कितीतरी पटीने अधिक होते. त्यामुळे संघाने हे केले, असे म्हणणे अविवेकी ठरेल. हे सर्व भारतातील जनतेने आणि रामभक्तांनी केले.

राष्ट्रीय आकांक्षेचे प्रतीक असलेल्या, श्रीराम जन्मभूमीवर रामलला प्राणप्रतिष्ठा करण्याचा क्षण निश्चितच आपल्यासाठी अनमोल आहे. प्रत्येक भारतीय आनंदी आहे. एका दीर्घकालीन संकल्पाच्या पूर्ततेचा अनोखा उत्साह, उत्सव आणि आनंदाची भावना जगातील तमाम हिंदू आणि भारतप्रेमी लोकांमध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळते. हे अशक्य वाटणारे काम कसे शक्य झाले, याचे आजही लोकांना आश्चर्य वाटते आणि लोक संघाकडे पाहतात. एकदा मला एका व्यक्तीने विचारले की, “भारताच्या स्वातंत्र्यानंतर संघाचे योगदान काय होते?” मी म्हणालो, “आपण केवळ व्यक्तिनिर्माण, सामाजिक संघटन आणि राष्ट्रीय चेतना जागृत करणार आहोत, हे संघाने ठरवले आहे. अशी राष्ट्रीय भावनेने जागृत माणसे समाजाच्या पाठिंब्याने जे आवश्यक, करणीय आणि अपेक्षित असेल ते करतील. बाकी संघ काहीही करणार नाही. त्यामुळे संघाने काय केले याचे उत्तर आहे-सामाजिक भान आणि सज्जनशक्तीचे संघटन.” पण, संघ नसता तर भारतात काय घडले नसते, याची एक लांबलचक यादी तयार करता येईल.

हिंदुत्व विचाराचे प्रणेते आणि हिंदुत्वाला हिंदी महासागर ओलांडून अमेरिकेत प्रसिद्धी मिळवून देणारे, स्वामी विवेकानंद यांची जन्मशताब्दी १९६३ मध्ये सुरू होणार होती. अमेरिकेला जाण्यापूर्वी स्वामीजींनी दोन वर्षे भारतभर दौरा केला आणि शेवटी दि. २५ डिसेंबर १८९२ रोजी समुद्रात असलेल्या श्रीपादशीला येथे पोहत-पोहत कन्याकुमारीला येऊन पोहोचले. तेथे तीन दिवस व रात्र ध्यान केल्यावर त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश आणि दिशा सापडली. त्यानंतर पुढे ते अमेरिकेला गेले. त्यामुळे १९६२ मध्ये तत्कालीन तामिळनाडू सरकारने स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे स्मारक म्हणून त्या खडकावर त्यांचा भव्य पुतळा बसवण्याचा निर्धार केला. पण, ख्रिश्चनांनी तो खडक जबरदस्तीने ताब्यात घेतला आणि ख्रिश्चन क्रूरकर्मा झेवियरच्या स्मारकाची योजना जाहीर केली. या वादाची कोंडी टाळण्यासाठी, तामिळनाडू सरकारने स्वामी विवेकानंदांचे स्मारक बांधण्याची योजना सोडून दिली. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक श्रीगुरुजींनी हे कार्य पूर्ण करण्याचे दायित्व संघाचे तत्कालीन सरकार्यवाह एकनाथजी रानडे यांच्यावर सोपवले. संघाच्या स्वयंसेवकांनी त्या खडकावरील ख्रिश्चनांचे नियंत्रण हटवून, तेथे स्वामी विवेकानंद स्मारक उभारण्याची योजना आखली. या स्मारकासाठी सर्वसामान्यांकडून प्रतीकात्मक म्हणून केवळ एक, दोन किंवा पाच रुपये घेण्याचा ठराव करण्यात आला. यानंतर, संपूर्ण भारतातील ३० लाख लोकांकडून ८० लाख रुपये जमा झाले. इतकेच नव्हे, तर त्या काळातील सर्व राज्य सरकारांकडून (१९६३ मध्ये बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसशासित सरकारे होती) प्रतीकात्मक आर्थिक मदत देण्याचे वचन घेण्यात आले.
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, केरळ आणि जम्मू-काश्मीर वगळता सर्व राज्य सरकारांनीही आर्थिक मदत केली. या कारणास्तव प्रांत, भाषा, उपासनेच्या विविधतेच्या वरती उठून सर्व राज्यांतील प्रत्येक गावात हिंदुत्वाचा जागर झाला. आज सुदूर दक्षिणेत असलेले स्वामी विवेकानंद शीला स्मारक संपूर्ण भारतातील लोकांच्या श्रद्धेचे आकर्षणाचे केंद्र बनले. हिंदू समाजाने हे केले आहे, हे निर्विवादच. पण, संघ होता म्हणून हे अलौकिक कार्य शक्य झाले, हेदेखील खरे आहे.हिंदू समाजात मोक्षप्राप्तीसाठी विविध प्रकारच्या आध्यात्मिक उपासना-साधनेची सनातन परंपरा आहे. त्यात उपासनेचे नवनवे मार्ग जोडले जात आहेत आणि अजून जोडले जातील, हे हिंदू संस्कृतीचे, विचारांचे वैशिष्ट्य आहे. अशा ऋषी, संत, मठाधिपती इत्यादींना एकत्र आणून, हिंदू समाजाची सद्यःस्थिती आणि भविष्यातील योजना यांवर चर्चा करण्यासाठी, एका व्यासपीठाची गरज भासू लागली. त्यासाठी तत्कालीन सरसंघचालक श्रीगुरुजींच्या प्रयत्नाने १९६४ मध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. पहिल्या सभेत जैन, शीख, बौद्ध यांच्यासह हिंदू समाजातील सर्व प्रमुख संत, महंत उपस्थित होते. १९६६ मध्ये तीर्थराज प्रयाग येथे विश्व हिंदू परिषदेची पहिली धर्म परिषद झाली, ज्यामध्ये शेकडो वर्षांनंतर प्रथमच चारही शंकराचार्य पीठांचे शंकराचार्य आणि सर्व प्रमुख मठाधिपती आणि धार्मिक नेते उपस्थित होते. हिंदू समाजाच्या कमकुवतपणामुळे, जबरदस्तीने धर्मांतरित झालेल्या अनेक हिंदूंना त्यांच्या मूळ परंपरांमध्ये परत यायचे होते. पण, धर्मांतरानंतर ते अपवित्र झाले, असे मानण्याची प्रथा रूढ झाली. हिंदू समाज त्यांचे रक्षण करू शकला नाही. त्यामुळे त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आले. आता त्यांना परत घेण्याची जबाबदारी आमची आहे, आम्ही त्यांचे स्वागत करू, असा ठराव या धार्मिक परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला.
 
 
हिंदूंचे कधीच अधःपतन होऊ शकत नाही. ‘न हिन्दुः पतितो भवेत’ हे सूत्र घोषणा बनले. तसेच विश्व हिंदू परिषदेची दुसरी धर्माचार्य परिषद १९६९ साली कर्नाटकातील उडुपी येथे झाली. सर्व हिंदू एकाच देवाची लेकरे आहेत, सर्वांमध्ये ईश्वराचा अंश आहे, असे मानणार्‍या हिंदू समाजात दुर्दैवाने जातिभेद, अस्पृश्यतेची विकृत भावना निर्माण झाली. या परिषदेत अस्पृश्यतेसारख्या चुकीच्या रूढींना धर्मात आधार नसल्याचा ठराव सर्व धर्मगुरूंनी एकमताने संमत केला. हे काम संघाने केले नाही; परंतु संघामुळे ते शक्य झाले, हेही खरे आहे. सर्व हिंदू बांधव आहेत. ‘हिन्दव: सोदराः सर्वे, न हिन्दुः पतितो भवेत’ हे नवे सूत्र बनले.१९८१ मध्ये तामिळनाडूतील मीनाक्षीपुरममध्ये अनुसूचित जातीच्या लोकांचे सामूहिक धर्मांतर करण्याची घटना घडली. यामुळे संपूर्ण भारतातील लोकांची मने हादरली. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अशी धर्मांतरे रोखण्यासाठी आणि धर्मांतरामुळे बाधित, अशिक्षित, शोषित, असाहाय्य, वंचित, मागासवर्गीय समाजाला सामाजिक न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी, तसेच त्यांच्यामध्ये जागृती आणण्यासाठी, त्यांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने विविध योजना आखण्यात आल्या. त्यांच्यात सामाजिक भान जागृत करण्यासाठी, सेवा प्रकल्प आखण्यात आले. यासाठी देशभरातील ५ हजार, ५०० गावांमध्ये ‘संस्कृती रक्षा निधी’ जमा करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. त्याचवेळी, आधीच्या घोषणेमध्ये आणखी एक सूत्र जोडले गेले-

हिन्दव: सोदराः सर्वे,
न हिन्दुः पतितो भवेत्
हिन्दुरक्षा मम दीक्षा, मम मन्त्रः समानता..
 
सुदूर तामिळनाडूतील एका लहानशा गावात झालेल्या, या सामूहिक धर्मांतराला भारतातील सर्व राजकीय पक्षांच्या लोकांकडून सारखाच प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण देशानेही अशीच भावना दर्शवली आणि अनुभवली. यातून प्रेरित होऊन संपूर्ण देशात एकात्मतेची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषदेतर्फे भारतमातेची प्रतिमा आणि गंगा जल असलेला कलश घेऊन, संपूर्ण भारताला जोडणार्‍या तीन प्रमुख यात्रा काढण्याची योजना आखली. ’एकात्मता यज्ञयात्रा’ या नावाने काठमांडू ते रामेश्वरम् (पशुपती रथ), हरिद्वार ते कन्याकुमारी (महादेव रथ) आणि गंगासागर ते सोमनाथ (कपिल रथ) या तीन मुख्य यात्रांबरोबरच ३०० हून अधिक उपयात्रा होत्या. ज्यांनी एक हजार दिवसांत भारतातील बहुतेक ठिकाणे जोडली. लोक आपापल्या ठिकाणाहून पवित्र पाण्याच्या कलश घेऊन, या यात्रेत सहभागी झाले होते. एकूण ३८ हजार, ५२६ ठिकाणांहून ७७ हजार, ४४० कलश पूजेसाठी आले होते. यामध्ये भारतातील एकूण ५ लाख, ६४ हजार, ३४२ ठिकाणांपैकी १ लाख, ८४ हजार, ५९२ ठिकाणांहून ७ कोटी, २८ लाख, ५ हजार, ५२० लोकं सहभागी झाले होते. ज्यात ४९ टक्के महिला होत्या. जात, प्रदेश, भाषा, उपासना इत्यादींच्या विविधतेच्या वर जाऊन संपूर्ण हिंदू समाजात एकात्मतेची भावना जागृत होत असल्याचे लोकांना यावेळी अनुभवले.

 
दरम्यान, उत्तर प्रदेशातील मेरठजवळील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या एका धार्मिक सभेत उत्तर प्रदेश सरकारचे तत्कालीन मंत्री दाऊदयाल खन्ना यांनी अयोध्येतील श्रीरामललाच्या मंदिराला कुलूप असून, पूजारी वगळता कोणत्याही रामभक्ताला आत जाण्याची परवानगी नाही, असे निदर्शनास आणून दिले. मुघल आक्रमक बाबरने केवळ आक्रमणाचा धाक दाखवण्यासाठी, श्रीरामललाचे मंदिर पाडून, त्याच ठिकाणी मशीद बांधण्याचा गुन्हा केला होता. तथापि, इस्लामच्या विद्वानांचे म्हणणे आहे की, बळजबरीने ताब्यात घेतलेल्या जमिनी किंवा इमारतींमध्ये अदा केल्या जाणार्‍या प्रार्थना अल्ला स्वीकारत नाहीत, तरीही हे गैरइस्लामी कृत्य केवळ हिंदू समाजाचा अपमान, तेजोभंग करण्यासाठी करण्यात आले. यानंतर पुन्हा मंदिराच्या स्थापनेसाठी सातत्याने संघर्ष सुरू होता. ब्रिटिश राजवटीत १९३८ मध्ये न्यायालयाच्या आदेशाने या वादग्रस्त जागेच्या १०० मीटर परिसरात मुस्लीम समुदायाला येण्यास बंदी घालण्यात आली होती. १९४९ मध्ये रामलला तेथे प्रकटले. तेव्हापासून मंदिराला कुलूप होते आणि रामललाची नियमित पूजा सुरू होती. केवळ पूजार्‍याला कुलूप उघडून, पूजेसाठी मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी होती.

 
त्यामुळे रामललाच्या मंदिराचे कुलूप उघडण्यासाठी, विश्व हिंदू परिषदेने जनजागृती कार्यक्रम आयोजित केले होते. फेब्रुवारी १९८६ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाने मंदिराचे कुलूप उघडण्यात आले आणि रामभक्तांना मंदिरात दर्शनासाठी जाणे शक्य झाले. या विजयामुळे हिंदू समाजाचे मनोबल वाढले आणि आक्रमणाचे प्रतीक असलेल्या विवादित वास्तूच्या जागी श्रीरामललाचे भव्य मंदिर बांधण्याची योजना आखण्यात आली. यासाठी जनजागृती करण्यासाठी, देशभरात ठिकठिकाणी रामशीला पूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि या रामशीला समारंभपूर्वक अयोध्येत येऊ लागल्या. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीप्रमाणेच अयोध्येत श्रीरामललाचे भव्य मंदिर बांधणे, हा इस्लाम किंवा मशिदीला विरोध नसून भारताचे वैभव पुनर्संचयित करण्याचे काम आहे. त्यामुळे भारतभर अभूतपूर्व जनजागृती झाली. गावागावांतून त्यावर ’श्रीराम’ लिहिलेल्या विटा गोळा करायच्या, रामशीलेची पूजा करायची आणि राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येला पाठवायची योजना आखली गेली. संपूर्ण भारतभर व्यापक जनसंपर्क आणि जनजागृती झाली. २ लाख, ७५ हजार गावांमध्ये सहा कोटी लोकांनी रामशीलेचे पूजन केले. संपूर्ण देश राममय झाल्याचे दिसत होते. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक ताकदीपेक्षा किंवा जनसंपर्कापेक्षा कितीतरी पटीने अधिक होते. त्यामुळे संघाने हे केले, असे म्हणणे अविवेकी ठरेल. हे सर्व भारतातील जनतेने आणि रामभक्तांनी केले. यात संघ केवळ सोबत होता. संघ नसता तर एवढा व्यापक, जनसंपर्क आणि जनजागृती कदाचित झाली नसती. उदाहरणार्थ, इमारत उभी करताना, त्याचा सर्व भार सहन करण्यासाठी, पाया मजबूत खांबांचा बनलेला असतो.


हा खांब उभा करण्यासाठी लोखंडी सळ्यांचा सांगाडा (पंजर) मदत करतो. या सांगाड्यात इमारतीचे वजन उचलण्याची क्षमता नाही. पण, त्या आरसीसी पिलरमध्ये हा भार सहन करण्याची क्षमता या लोखंडी सांगाड्यातून येते, जी बाहेरून दिसत नाही. संघाला संपूर्ण समाज संघटित करून समाजात अशी रचना निर्माण करायची आहे की, समाजाच्या हिताच्या प्रत्येक कार्यात ‘पंजर शक्ती’ उपलब्ध होईल. जागृत समाजच आपले कार्य करेल.या सर्व प्रबोधनाची सांगता दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवेत झाली. न्यायालयात संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतरही न्याय व निर्णय मिळण्यास होणारा विनाकारण विलंब पाहता कारसेवेसाठी आलेले अडीच लाखांहून अधिक कारसेवक बेभान झाले. एवढा मजबूत ढाँचा अवघ्या पाच तासांत कोसळणे अकल्पनीय आणि अशक्य होते. ही कारसेवा नियंत्रणाबाहेर जात असतानाही, सर्वांचा स्वतःवर ताबा होता. त्यामुळे या सर्व गोंधळात रामललाची मूर्ती सुरक्षितपणे हटवणे आणि तात्पुरते शेड बांधणे शक्य झाले. यासोबतच ५५ हजार लोकसंख्या असलेल्या अयोध्येत दहा टक्के मुस्लीम समाज राहतो. तेथे सुमारे १५ मशिदी आहेत. या लाखो कारसेवकांनी एकाही मशिदीवर दगडफेक केली नाही. तसेच कोणत्याही मुस्लिमासोबत गैरवर्तन झाले नाही. डाव्यांचे त्यांच्या आंदोलनांमध्ये हिंसक असणे, जवळपासच्या निष्पाप लोकांची घरे, दुकाने, वाहने इत्यादींची तोडफोड करणे आणि चरैवेति, चरैवेति...जाळणे हा नेहमीचा अनुभव आहे. पण, भारतभरातून सुमारे २ लाख, ५० हजार कारसेवक इथे आले होते. मात्र, या अनियंत्रित परिस्थितीतही कारसेवकांनी असा संयम राखला, याचे आश्चर्य वाटते. कारण, हे अभियान मशिदीच्या विरोधात किंवा मुस्लीम समाजाच्या विरोधात नव्हती आणि त्या खांबांचे ’पंजर’ संघाचे होते, त्यामुळे त्या गर्दीत ताकद आणि संयम दोन्ही होते.

विद्यार्थी, शेतकरी, मजूर, शास्त्रज्ञ, कलाकार, अधिवक्ता इत्यादी समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींची पुनर्बांधणी आणि विकास व्हावा, असे विचार करणारे आणि कार्य करणारे लोक निर्माण करण्याचे हे व्यक्तिमत्त्व घडवण्याचे मूलभूत काम संघ करेल. संघ याशिवाय दुसरे काही करणार नाही. अशा राष्ट्रीय विचारांनी जागृत झालेले लोक समाजाच्या मदतीने आणि सहकार्याने नवीन सर्जनशील व्यवस्था निर्माण करतील, हे आपले उद्दिष्ट आहे. राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संघ आणि स्वयंसेवक कटिबद्ध आहेत. जवळपास १२ हजार शाळा आणि ८४ हजार एकल शाळांच्या माध्यमातून भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षणाचे यशस्वी प्रयोग समाजात सुरू आहेत. सरकारवर अवलंबून न राहता, आपल्या सामूहिक प्रयत्नातून समाज दोन हजार गावांमध्ये विकासासाठी आणि आठ हजार नागरी वस्त्यांमध्ये वस्ती विकासासाठी पुढाकार घेत आहे. सामाजिक विषमतेची प्रथा संपवून सुसंवादी आणि एकात्म समाज निर्माण करण्यासाठी भारतभर प्रयत्न सुरू आहेत. नोकरी मागण्याऐवजी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा, प्रशिक्षण आणि पाठबळ देण्यासारख्या अनेक गोष्टी समाज सक्रियपणे करत आहे. असा समाज घडवण्यासाठी या सर्व कामात त्यांच्यासोबत स्वयंसेवक सक्रिय असतात.

 
भारताच्या ’स्व’चा आधार भारताचे अध्यात्म आहे, ज्याचे एक प्रतीक म्हणजे श्रीराम आहेत. कोरोनाचा भयंकर, प्राणघातक, संसर्गजन्य रोग जगातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालत होता. एकट्या भारतात या संसर्गजन्य आजाराच्या वेळी सरकारी यंत्रणांसह संघाचे ५.५ लाख स्वयंसेवक आणि समाजाचा एक मोठा वर्ग लोकांच्या मदतीसाठी सक्रिय होता. ही भारतीय सामान्य समाजाची आध्यात्मिक अभिव्यक्ती होती. जी या संसर्गजन्य रोगाच्या संकटाच्या काळात दिसून आली. भारताच्या ’स्व’चा दुसरा आधार म्हणजे समाजाच्या (राष्ट्राच्या) बहुतांश व्यवस्था राज्याधारित न राहता, समाजाधारित राहतात. याचा अनुभव या कोरोनाच्या काळात आला.

संघाच्या एका गीतात म्हटले आहे की,
केवल सत्ता से मत करना परिवर्तन की आस
जाग्रत जनता के केंद्रों से होगा अमर समाज...

संघ जनजागृतीसाठी अशा शाखा चालवतो. असे जागृत स्वयंसेवक समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत एक रचना निर्माण करतील. बाकीचे काम समाज करेल, त्याला बळ आणि दिशा देण्याचे काम अशी केंद्रे करतील. आरसीसीच्या खांबांमधील भार सहन करण्याची क्षमता वाढवणारे पंजर निर्जीव लोखंडाचा बनलेले आहे, परंतु जागृत समाजाच्या अशा कार्यात आणि चळवळीत, हे अदृश्यपणे जोडलेले ’पंजर’ जीवंत मानवांचा आहे, जो सर्वत्र स्थिर आहे. त्यासाठी संघ असे आत्मविलोपी, निष्ठावान, समर्पित आणि वचनबद्ध कार्यकर्ते तयार करत आहे. ’ठेाश ुरी पेीं र्लीळश्रीं ळप र वरू’ असे म्हणतात. त्याचप्रमाणे हा राष्ट्रीय जाणिवेचा जागर एका दिवसात शक्य झाला नसून, अविरत प्रयत्न आणि समाजाच्या वाढत्या पाठिंब्यामुळेच ते शक्य झाले आहे.२०१४च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल दि. १६ मे रोजी आले. ब्रिटनमधून प्रकाशित होणार्‍या दैनिक ’द गार्डियन’ (मे १८, २०१४च्या संपादकीयाची सुरुवात पुढीलप्रमाणे आहे''Today, May, २०१४ may well go down in history as the day when Britain finally left India.'' यात ’द गार्डियन पुढे लिहितो- ''It should be obvious that underlying changes in Indian society have brought us Mr. Modi and not the other way around.'' हे राष्ट्रीय प्रबोधन सुरू झाले आहे आणि सुरू राहील. श्रीरामजींच्या भक्तीमुळे हे सोपे झाले. राष्ट्रकार्य आपल्याला करावे लागेल, हे करत राहावे लागेल. आपल्याला चालत राहावे लागेल. चरैवेति, चरैवेति...
 

डॉ.मनमोहन वैद्य
 
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह आहेत.)
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.