हल्दवानीमध्ये तरुणाची गोळ्या घालून हत्या; कट्टरपंथींनी फेकला रेल्वे रुळावर मृतदेह!

    10-Feb-2024
Total Views |
Haldwani Violence

नवी दिल्ली : हल्दवानी हिंसाचारानंतर तेथील पोलीस प्रशासन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बहुतांश ठिकाणचा कर्फ्यू हटवण्यात आला आहे. मात्र बनभूलपुरा येथे अजूनही कर्फ्यू लागू आहे. दरम्यान, हिंसाचार भडकावल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते मतीन सिद्दीकी यांचा भाऊ जावेद सिद्दीकी याला पोलिसांनी अटक केली आहे.

तरी पोलीसांनी केलेल्या तपासादरम्यान हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक याचे नावही उघड झाले आहे.बेकायदा मशीद जेथून हटवण्यात आली ती जमीन त्याच्या ताब्यात होती. याशिवाय समाजवादी पक्षाच्या आणखी एका नेत्याचे नावही तपासात उघड झाले आहे. त्यापैकी एकाचे नाव अर्शद अयुब आहे. बानभुलपुरा येथील नगरसेवक झीशान परवेझ हे देखील पोलिसांच्या निगराणीखाली आहेत.

दंगलखोरांच्या अटकेची कारवाई सुरू झाली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने दंगलखोरांची ओळख पटवली जात आहे. ड्रोनच्या माध्यमातून परिसरावर नजर ठेवली जात आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मृतांवर झालेल्या क्रूरतेबाबत मीडियामध्ये अनेक खुलासे झाले आहेत. दंगलखोर जमावाने बेकायदेशीर शस्त्रे घेऊन रस्त्यावर उतरून अनेक निरपराधांचे बळी घेतल्याची माहिती मिळाली आहे. आता त्या मृतांच्या कुटुंबीयांचे रडणारे छायाचित्र समोर येत आहेत.

एका व्हिडिओमध्ये ती महिला रडत सांगत आहे की, तिचा मुलगा अजय औषध घेण्यासाठी गेला होता पण त्याला गोळी लागली. याच दंगलीत बाजपूर येथील प्रकाश कुमार यांनाही तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि नंतर त्यांना उचलून रेल्वे रुळावर फेकण्यात आले होते. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. आता त्याचे पोस्टमॉर्टम होणार आहे.

याशिवाय बनभूलपुरा येथे मृत्युमुखी पडलेल्या सर्व ५ जणांना गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या दंगलखोरांवर कडक कारवाई करणार आहेत. ५ जणांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी आणि अनेक पोलिस जखमी झाल्याप्रकरणी पोलिसांनी ३ एफआयआर नोंदवले असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या कारवाईला घाबरुन अनेक आरोपी बेपत्ता होत आहेत. हे पाहून बेपत्ता झालेले हे लोक आरक्षित वनक्षेत्रात किंवा अतिक्रमण झालेल्या भागात लपायला जाण्याची भीती वनविभागाला वाटत आहे.

याबाबत वनविभागाने गौला पर्वतरांगेतील बाणभुळपुरा जवळील जंगलातही गस्त घातली. मात्र एकही संशयित पकडला गेला नाही. मात्र तरीही वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने आमला चौकी, इंदिरानगर, लालकुआन, बगजाळा, गौलापुल, बगजाळा ते दाणीबांगरपर्यंतच्या जंगलात गस्त सुरु ठेवली आहे. वनक्षेत्राचे संरक्षण आणि संशयितांची घुसखोरी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे रेंजर गौला चंदन अधिकारी यांनी सांगितले.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारानंतर वनविभाग पुन्हा एकदा अतिक्रमणाविरोधात आपला अहवाल तयार करत आहे. यापूर्वीही त्यांनी असा प्रयत्न केला होता, मात्र कारवाईमध्येच थांबली होती. मात्र या हिंसाचारानंतर पुन्हा अतिक्रमणाविरोधात मोहीम राबविण्याचा अहवाल तयार करण्यात आल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.