देहरादून : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या निषेधार्ह रुद्रपुर येथे रविवार दि. ८ डिसेंबर रोजी जाहीर निषेध रॅली ( Rally ) काढण्यात आली. शहरातील गांधी पार्कमध्ये संतांसोबतच हिंदू आणि बंगाली समाजाचे हजारो लोक एकत्र आले. या ठिकाणी संतप्त जमावाने घोषणाबाजी केली आणि सरकारने योग्य ती पावले उचलायला हवीत असे निवेदन राष्ट्रपतींना दिले.
बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणारा अत्याचार हा दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. यासाठी आता भारतातील जनताही आवाज उठवत आहे. बांगलादेशात घडत असलेल्या घटनांचा निषेध म्हणून उत्तराखंडातील रुद्रपुर येथील गांधी पार्कमध्ये हजारोंच्या संख्येने लोक एकत्र जमले व निषेध रॅली काढली. या रॅलीमध्ये वेगवेगळ्या घोषणा देत आपला परखड निषेध करण्यात आला. ही रॅली 'मानवाधिकार मंचा'च्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.
मानव अधिकार मंचाच्या साधू संतांनी म्हटले की, "बांगलादेशात घडत असलेला प्रकार हा घृणास्पद आहे. हिंदू आणि अल्पसंख्यांक यांच्यावर कट्टरपंथीयांचा उन्मात सुरुच आहे. धार्मिक स्थळांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या सर्वाचा निषेध म्हणून या भव्य रॅलीत घोषणाबाजी करण्यात आली. जिहादींनी लोकशाहीवर वर्चस्व गाजवले असून आंतरराष्ट्रीय संघटनाही यासंदर्भात काही बोलत नाहीत. बांगलादेशात अल्पसंख्याकांच्या संपत्ती व धार्मिक चारित्र्याची हत्या होत आहे. त्यामुळे भारतीय जनता विविध माध्यमातून संताप व्यक्त करत आहे. आता सरकारने योग्य ती पावले उचलून बांगलादेशातील हिंदू व सोबतच इतर अल्पसंख्यांक जनतेला सुरक्षा मिळवून दिली पाहिजे." संयुक्त राष्ट्रांनी यासंदर्भात तपास आयोग स्थापन करुन या सर्व घडणाऱ्या अत्याचारांची निष्पक्ष आणि व्यापक चौकशी करावी, व पिडीतांचे योग्य त्या प्रकारे पुनर्वसनासाठी योग्य त्या योजना आखणे गरजेचे असल्याचे या रॅलीच्या माध्यमातून सांगण्यात आले.