युष्याला नवी दिशा मिळावी, असे प्रसंग प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला यावेत. पण, असा प्रसंग महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत घडावा की, ज्यामुळे आपल्या राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळावी, आजचा दिवस तो आहे. आज देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत, हे महाराष्ट्राचे सुदैव.
देवेंद्रजी फडणवीस हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहेत, जे केवळ एक सक्षम राजकीय नेता म्हणूनच नव्हे, तर एक उत्तम माणूस, मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे सहकारी म्हणून भाजप परिवाराचे बलस्थान आहेत. कठीण किंवा अशक्य वाटणार्या गोष्टी देवेंद्रजी यांच्या माध्यमातून सहजसोप्या होऊ शकतात, याचे अनेक अनुभव आम्ही सहकार्यांनी घेतले आहेत. गेल्या पंधरा वर्षांत, त्यांच्यासोबत जवळून काम करताना विविध प्रसंगांमध्ये मला अनेक अनुभव आले, ज्याचे अचूक शब्दात वर्णन करणे कठीण आहे. त्यांचा सहवास माझ्या वैयक्तिक आणि राजकीय प्रवासात मार्गदर्शक आणि अनेकदा कलाटणी देणारा ठरला आहे.
देवेंद्रजी आज पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहेत. त्याचे समाधान आजच्या दिवशी वाटत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल मान्य करून नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी ऊर्जा दिली. दिवस-रात्र संघटनेसाठी नियोजन, अंमलबजावणी आणि सतत सकारात्मकदृष्टी ठेवून काम केले. त्याचे आज फलित झाले, अशी आमची भाजप परिवाराची आज भावना आहे.
माझ्या दृष्टीने, देवेंद्रजी यांचा एक वेगळा पैलू म्हणजे ते त्यांच्या सहकार्यांना नेहमी आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करतात. २०१९ सालानंतर तर त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर व्यक्तिगतरित्या अत्यंत हीन पातळीवर टीका करण्याचे षडयंत्र जाणीवपूर्वक राबवले गेले. पुरोगामी विचारांच्या बुरख्या आडून देवेंद्रजींना जातीवरून सतत ट्रोल केले गेले. या विकृत प्रचाराने न डगमगता, त्यांनी कणखरपणे भाजपला राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष बनविले. देवेंद्रजींनी त्यांच्या राजकारणात दैनंदिन कामातही त्यांची अभ्यासूवृत्ती आणि निर्णय घेण्याची स्पष्टता खरोखरच प्रेरणादायक आहे. अनेकदा, कठीण प्रसंगांमध्ये त्यांनी केवळ परिस्थितीच हाताळली नाही, तर त्यांचे कर्तृत्व अजूनच उठून दिसले.
देवेंद्रजी यांचे नेतृत्व हे केवळ पदासाठी नव्हे, तर कामगिरीसाठी ओळखले जाते. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ असो की, विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी, त्यांनी प्रत्येकवेळी महाराष्ट्राच्या जनतेसाठी स्वतःला झोकून दिले. ‘जलयुक्त शिवार’सारखी ‘दृष्टिकोनात्मक योजना’ राबवताना मी जवळून पाहिले आहे की, त्यांनी शेतकर्यांसाठी किती संवेदनशीलपणे विचार केला. ही योजना त्यांच्या कामाचा केवळ एक भाग नव्हता, तर त्यामागे त्यांचा राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा एक व्यापक दृष्टिकोन होता. त्यांच्यासारख्या नेत्यासोबत काम करण्याचा अभिमान आहे आणि भविष्यातही त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी योगदान देण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे.
अगदी लहानसहान निर्णयांमध्येही ते सर्व बाबींचा विचार करून पुढे जातात. उदाहरणार्थ, एकदा ‘जलसंधारणाच्या प्रकल्पा’वर काम करताना त्यांनी सांगितले की, एखादा प्रकल्प म्हणजे फक्त आकडेवारी नव्हे; तो लोकांच्या आयुष्याला प्रत्यक्ष परिणाम करतोय का, हे महत्त्वाचे. या एका वाक्याने माझ्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.
आजही, महाराष्ट्राच्या राजकारणात ते केवळ एक नेता नाहीत, तर एक दिशा देणारे तत्त्वज्ञ आहेत, असे मला वाटते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज ‘नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग’, ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘विविध औद्योगिक प्रकल्प’ उभे राहिले आहेत. परंतु, मला वाटते त्यांच्या राजकीय जीवनाचा सर्वोत्तम कालखंड अजून यायचा आहे. त्यांच्यासोबत काम करणे ही केवळ एक जबाबदारी नव्हे, तर आयुष्यभरासाठी मिळालेली शिदोरी आहे.
कार्यकर्ता म्हणून भाजपचे काम करताना आज दोन दशकांहून अधिक कालावधी लोटला. पक्षाने मला शिस्त, विचारसरणी आणि निर्णय घेण्याची क्षमता दिली आहे. भाजपच्या संस्कारांमुळे आणि पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने दाखविलेली विश्वासाची भावना आणि दिलेली संधी, यामुळेच देवेंद्रजींसोबत मला जवळून काम करता आले. याबद्दल मी आजन्म पक्षाचा ऋणी आहे. कारण, त्यांनी दिलेली विचारसरणी आणि त्यातूनच थोरांचा मिळणारा सहवास, या दोन गोष्टी माझ्यासाठी कायमच प्रेरणादायी आहेत.
डोंबिवलीसाठी देवेंद्रजींचे विशेष योगदान
डोंबिवलीसारख्या वेगाने विकसित होणार्या भागासाठीही देवेंद्रजींचे नेतृत्व नेहमीच महत्त्वाचे ठरले आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या काळात डोंबिवलीला वेगवान पायाभूत सुविधा मिळाल्या. विशेषतः डोंबिवली ते ठाणे, नवी मुंबई, आणि कल्याण या परिसरांना जोडणार्या समृद्धी मार्गिका आणि प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. या भागातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजांना उत्तर देण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे डोंबिवलीसारखा परिसर अधिक नियोजित आणि सुस्थितीत उभा राहत आहे. जेथील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सुविधांचा फायदा मिळत आहे. म्हणूनच समस्त डोंबिवलीकरांतर्फे आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेतर्फे देवेंद्रजींना मनःपूर्वक शुभेच्छा! महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीचा आलेख आपल्या नेतृत्वात अजूनच वाढत राहो, ही सदिच्छ...
रविंद्र चव्हाण, आमदार