लखनऊ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर खुर्जा या शहरात एक मंदिर आहे. जे सुमारे ५० वर्षे जुने असल्याचे सांगितले गेले असून मागील ३० वर्षांपासून मंदिराचे दरवाजे कुलूपबंद होते. हे मंदिर जाटव समाजाने बांधले असल्याचे सांगण्यात येते. १९९० च्या दंगलीनंतर जाचव समाजाने बुलंदशहर सोडले आणि तेव्हापासून मंदिराचे दरवाजे कायमस्वरूपी बंद झाले. यावेळी समाजातील एका कुटुंबाकडून मंदिरातील मूर्तीचे नदी पात्रात विसर्जन करण्यात आले.
खुर्जाचे एसडीएम दुर्गेश सिंह म्हणाले की, हे मंदिर सलमा हकन परिसरात असून मंदिराच्या भिंती या भक्कम असल्याचे त्याला सुरक्षित तटबंदी आहे. या जागेबाबत कोणत्याही समाजामध्ये वाद नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंदिराच्या मूर्तीचे नदीत विसर्जन करण्यात आले असून याप्रकरणाचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.
मंदिराचा शोध लागल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने आणि जाटव विकास मंचने प्रशासनाकडे मंदिराच्या जीर्णोद्धाराची मागणी केली. हे मंदिर १९९० सालापासून बंद होते. याठिकाणी राहणाऱ्या हिंदू कुटुंबांनी दंगलीच्या भीतीने पलायन केले होते. त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर करत मंदिराच्या स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठी विनंती करण्यात आली. यामुळे आता पुन्हा एकदा पूजा सुरू केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
जाटव विकास मंचचे अध्यक्ष कैलास भगमाल गौतम यांनी मंदिराच्या इतिहासावर प्रकाश टाकला आहे. हे संबंधित मंदिर जाटव समाजाच्या लोकांनी बांधल्याचे त्यांनी सांगितले आहे.