नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानावर चर्चा होत असतानाच, काँग्रेस पक्षाच्या सेनसोरशिपचे बोलके उदाहपण जनतेच्या नजरेसमोर आले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या संदर्भात देशाच्या संसदेत प्रश्न उपस्थित केले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अनेक मान्यवारांसोबत केलेले पत्रव्यवहार जे पंतप्रधान संग्रहालयात उपस्थित होते, परंतु २००८ साली युपीए सरकारच्या काळात सोनिया गांधी यांनी ती सगळी पत्रं तिथून हलवली. तब्बल ५१ कार्टन इतका साठा असलेले दस्ताऐवज अचानक स्थालंतरीत करण्यात आले असा सवाल आता विचारला जातोय.
पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या (पीएमएमएल) वार्षिक सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला की, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आइन्स्टाईन, श्रीमती अरुणा असफ अली, बाबू जगजीवन राम, श्रीमती विजयालक्ष्मी पंडित, श्री गोविंद बल्लभ पंत आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यामध्ये झालेले पत्रव्यवहार पंतप्रधान संग्रहालयात आताच्या घडीला उपस्थित नाही. ऐतिहासीक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे दस्ताऐवज अचानक गायब कसे होतात असा सवाल आता केला जातोय. भाजपचे प्रवक्ते संबित पत्रा यांनी केंद्रीय सरकारला विनंती केली आहे की सांस्कृतिक मंत्रालयाने या संदर्भातील सत्यता जनतेसमोर आणावी तसेच पंतप्रधान संग्रहालयास संपूर्ण दस्ताऐवज परत करण्यात यावा.
या व्यतिरीक्त पंतप्रधान संग्रहालयातील अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देखील विनंती केली आहे, की सदर पत्रव्यवहार त्यांनी पंतप्रधान संग्रहालयास परत करावा.