नागपूर : (CM Devendra Fadnavis) बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता एसआयटी (Special Investigation Team) चौकशी करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत माहिती दिली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याबाबत मागणी केली होती.
"...अश्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रात गांभिर्यानेच घेतल्या जातात!"
"बीड जिल्ह्यात झालेली घटना ही अतिशय निघृण आहे. त्यासंदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे, काहींना सस्पेंड केलंय, काहींना घरी पाठवलंय. तीन आरोपी सापडले आहेत, चार आरोपांचा शोध सुरु आहे. लवकरच ते सापडतील. स्पेशल एसआयटी कॉनस्टीट्यूट करुन या सरपंच हत्ये प्रकरणाची सगळी चौकशी करण्यात येईल. यात जो कोणी आरोपी असेल, तो कोणीही असला तरी त्याला सोडलं जाणार नाही. अश्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रात गांभिर्यानेच घेतल्या जातात!", असे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटले आहे.