कोलकाता : इस्कॉनशी संलग्न असलेले संत राधारमण दास म्हणतात की, बांगलादेशात तलवारीच्या जोरावर हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांना इस्लाम धर्मांत जबरदस्ती धर्मांतरण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. जे धर्मांतरण करण्यास तयार नाहीत त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. बांगलादेशात सध्या सत्तेत असलेल्या कट्टरतावाद्यांवर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, इस्कॉनचे संत चिन्मय दास यांना बांगलादेशात अटक करण्यात आले आहे असे ते कोलकाता येथे बोलत होते.
राधारमण दास यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, आम्हाला बांगलादेशात धर्मांतरणासाठी अल्पसंख्यांक आणि हिंदूंना धमकावले जात असून दहशत पसरवली जात आहे. येणाऱ्या धमक्या छळाला कंटाळून बांगलादेशातून भारतात पळून आलेल्या एका मुलीबाबतही त्यानी घडलेला एक किस्सा सांगितला ते म्हणाले की, ती मुलगी नदी ओलांडून भारतात आली होती.
पुढे दास म्हणाले की, एक युवती नदी ओलांडून आली होती. तिला आणि तिच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या होत्या. आम्ही युवतीला भारतीय नागरिकत्व देण्याची भारत सरकारकडे मागणी केली आहे. तसेच चिन्मय दास यांच्या जामीनासाठी जाणिवपूर्वक विलंब लावला जात असल्याचे ते म्हणाले आहेत.