रोहिंग्याची बांगलादेश सीमेवरून भारतात घुसखोरी, बनावट कागदपत्रे बनवत बंगालमध्ये केला विवाह

महाविद्यालयाला भेट देत वक्फ बोर्डप्रकरणाची माहिती मिळवण्याचा होता कट

    30-Nov-2024
Total Views | 88
 
Rohingyas
 
वाराणसी : उत्तर प्रदेशात दहशतवादी विरोधी पथकाने शुक्रवारी २९ नोव्हेंबर २०२४ म्यानमारमधील रोहिंग्या घुसखोर मोहम्मद अब्दुल्लाला वाराणसी येथून अटक करण्यात आली. संबंधित व्यक्तीने भारतात घुसखोरीच केली नसून त्यांनी वाराणसी येथील ज्ञानव्यापीसह चार मशिदींची रेकी केली होती असे सांगण्यात येत आहे. अब्दुल्ला यांनी बनावट कागदपत्रे बनवली होती. ज्यात आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्डाचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला हा पश्चिम बंगाल येथून मेदिनीपूर जिल्ह्यातील दुर्गाबंकाटी भागात राहत असल्याचे वृत्त आहे. गुरूवारी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी तो ट्रेनने वाराणसी येथे पोहोचला आणि शहरातील विविध ठिकाणी फिरतीवर होता. वक्फ बोर्डप्रकरणांची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशच्या विद्यालयाला भेट दिल्याची माहिती देण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांनी ज्ञानवापी येथे पोहोचून तेथील लोकांशी संपर्क साधण्याचे काम केले.
 
त्यांच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर दहशतवादी विरोधी पथकाला सतर्क राहण्यास सांगितले आहे. पश्चिम बंगालला परतण्यासाठी रेल्वेत चढत असताना त्याला वाराणसी कँट स्टेशनवरून अटक केली. मोहम्मद अब्दुल्ला असे म्यानमार येथे राहणाऱ्या या रोहिंग्याचे नाव असून त्यानेही आपल्या समुदायातील म्यानमार येथील इतर घुसखोरांना बांगलादेशातील सिमा ओलांडण्यासाठी मदत केली असल्याचे वृत्त आहे.
 
चौकशी वेळी अब्दुल्लाने बांगलादेशातून भारतात घुसखोरी करण्यात मदत केल्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, तो म्यानमारच्या अक्याब या जिल्ह्यातील मांगडूचा रहिवासी आहे. आतापर्यंत, त्यांनी पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातील दुर्गाबंकटी येथे त्यांचे घर बांधले आहे. अब्दुल्ला २०१८ पासून बनावट कागदपत्रांच्या आधारे मेदिनीपूर येथे राहत होता. त्याचवेळी त्याने आपला विवाह केला होता. दहशतवादी विरोधी पथकाने अब्दुल्ला यांच्या पत्नीच्या माहितीचा तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121