ठाणे : कळवा मुंब्र्यातील नागरी विकास कामांना ठाणे महापालिकेतील अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार मंजुरी मिळाली. मंजुरी देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ .श्रीकांत शिंदे आणि माझ्यासह अन्य नगरसेवकांना याचे श्रेय मिळायला हवे. पण जितेंद्र आव्हाड यांनी, मी आमदार मीच श्रेय घेणार, हा अहंकार जपला. नारळ फोडला, पत्रकार परिषदा घेऊन जाहीर केले म्हणजे विकास त्यांनी केला असे होत नाही. तेव्हा, आव्हाड यांनी २००९ पासून आजपर्यंत गेल्या १५ वर्षात शासनाकडून किती निधी आणला, याचे पुरावे द्यावेत, याची श्वेतपत्रिका जारी करावी. अशी जाहिर मागणी मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला ( Najeeb Mulla ) यांनी केली.
ठाणे महापालिकेतील शिवसेनेची सत्ता असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून व महापालिककेच्या माध्यमातून कळवा मुंब्र्यातील नागरी विकास कामांसाठी २०० कोटींचा निधी आणल्याचे सांगुन नजीब मुल्ला यांनी आव्हाडांची पोलखोल केली. जितेंद्र आव्हाड १५ वर्ष आमदार आहेत, त्यांच्या पक्षाचे नगरसेवक १५ वर्ष आहेत पण कळव्याच्या पुढे मनिषानगर येथील पाईपलाईनच्या पलिकडील भीमनगर परिसरात रस्त्यांवर डांबर नाही, सौचालय नाही, कचऱ्याचे ढीग साठलेत, अंथाराचे साम्राज्य आहे. आव्हाड हे अडीच वर्षे गृहनिर्माण मंत्री होते इथे अनेक शासकीय प्लाॅट आहेत त्यावर एकही झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणली नाही. पण यासाठी लोकांच्या विकासाची मानसिकता लागते, ती त्यांच्याकडे नाही. या परिसरात झोपू योजना आणणार, खारेगाव परिसरात क्लस्टर राबविणार, गार्डन देणार, ट्रॅफिकचा प्रश्न सोडविण्यासाठी आऊटर रिंग रोड करुन ९० फूट व ६० फूट रस्त्यावरून हायवेला सर्विस रोडवरुन ट्रॅफिक डिव्हाइड करणार.
डिझाईन तयार आहे. ही आमची दूरदृष्टी आहे. कळवा खारीगाव परिसरात पेट्रोल पंप सुरु करणार, सीबीएसई व आयसीएसई शाळा सुरु करणार, या परिसरासाठी टाक्या बांधून ठेवल्या आहेत पण यात पाणीच नाही. यामुळेच येथे लागणारे ७ एमएलडी पिण्याचे पाणी स्टेम्स, एमआयडीसीतुन आणून पाण्याची क्षमता वाढविणार, कळवा पूर्व भागातील नागरिकांच्या घरावर जाणीवपूर्वक टॅक्स न लावून महापालिकेचे आर्थिक नुकसान तर केलेच पण लोकांना आपल्या धाकात ठेवण्यासाठी अस्थिर केले आहे. कळवा पूर्वचा भाग झोपू योजनेतून डेव्हलपमेंट करणार, येथे स्मशानभूमी- कब्रस्थान देणार, शाळा देणार, हेल्थ सर्विस उभारणार, घोलाई नगर ते भास्कर नगर येथे स्कायवॉक देणार, पिण्याचे पाणी देणार, राजपार्क मधून घोलाई नगर येथे अंडरपास करणार, कळवा खारेगाव अग्निशमन केंद्र, सिगरेटी ट्रॅक व खेळाचे मैदान, स्पोर्ट्स सेंटर उभारणार कळवा मुंब्र्यातील नागरिकांसाठी त्रासदायक ठरलेला टोरन्ट पळवून लावणार, ड्रग्ज मुक्त कळवा मुंब्रा करणार ,शासकीय रिझर्व्ह प्लाॅट डेव्हलप करण्याची करणार.
रेल्वे अपघातात सर्वात जास्त मृत्यु कळवा मुंब्र्यातील स्पाॅटवर होतो यामुळेच कळवा मुंब्र्याची कनेक्टिव्हटी वाढविण्यासाठी तळोजामार्गे दिव्यावरुन मुंब्रा कळवा ते कापूरवावडी मेट्रोचे नियोजन करण्यात आले आहे.लोकहिताच कामे करण्यासाठी व्हिजन लागते, मेहनत करावी लागते, लोकांशी संवाद साधावा लागतो. महापालिकेची कामे आयती कामे असतात, कळवा मुंब्र्यात सुविधांची गरज आहे ते गेले १५ वर्षात झालेले नाहीत.१५ वर्षे एका माणसाला संधी दिली त्याचा वाईट अनुभव घेतलात, आता एकदा मला संधी द्या. कामच माझी ओळख आहे. वचननाम्यानुसार १०० टक्के कामे करणार आहे. यामुळे येत्या २० तारखेला घड्याळासमोरील दोन नंबरचे बटन दाबून मला विजयी करा,असे आवाहन नजीब मुल्ला यांनी केले.
कळवा - मुंब्यावरील अनधिकृतचा शिक्का पुसणार
निवडून आल्यावर कळव्यातील रहिवाशांसाठी तातडीने क्लस्टर योजना आणणार. आजपर्यंत झालेल्या अनधिकृत बांधकामांना अधिकृत करून चांगल्या सुसज्ज इमारती विकसित करणार. कळव्यातील विटावा येथे प्रथम क्लस्टर योजना सुरु केली जाईल. स्थानिकांना रोजगारासाठी विटाव्याजवळ आयटी हब चालू करणार. दिघा स्टेशन जवळ असल्यामुळे आयटी हब साठी चेंदणी कोळीवाडा येथून थर्ड ब्रीज कनेक्टिव्हिटी विटावा येथे दिली जाईल. येथील आयटी हबमुळे इथली कमर्शियल व्हॅल्युएशन वाढेल. व्हॅल्युएशन वाढले तर क्लस्टर योजना फिजिबल होईल.