
मुंबई, दि.७ : (Raj Thackeray) फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. पुण्यातील टिळक रोड येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात हा अनावरण सोहळा पार पडला. यावर्षी दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक ‘सरहद’ संस्थेतर्फे संमेलनाचे बोधचिन्ह निवडण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत पाठविलेल्या बोधचिन्हांमधून साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह निवडण्याची जबाबदारी 'सरहद' संस्थेने व्यंगचित्रकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सोपवली होती. त्यानुसार राज ठाकरे यांनी लोणी काळभोर येथील ‘मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटी अॅण्ड आर्ट’चे संचालक प्रसाद गवळी यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड केली गेली. निवडलेल्या बोधचिन्हाचे अनावरण बुधवारी झाले. या अनावरण सोहळ्यात राज ठाकरे यांनी मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाच्या अनुषंगाने साहित्यिकांशी संवाद साधला.
“महाराष्ट्रातील साहित्यिकांनी सामाजिक चळवळ उभारणे गरजेचे आहे आणि ज्या प्रकारची भाषा राजकारणात येत आहे ती रोखण्यासाठी राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे" असे वक्तव्य राज ठाकरे यांनी या सोहळ्यात साहित्यिकांशी संवाद साधताना केले.